'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 24 December 2013

पुस्तक परिचय

I have a dream – Rashmi Bansal

सामाजिक काम म्हणजे फक्त 'charity' ह्या  संवेदनेला छेद देणारे एक पुस्तक म्हणजे रश्मी बन्सल ह्यांचे "I have a Dream". रश्मी बन्सल ह्यांची चार पुस्तके खूपच प्रसिद्ध झाल. त्याव्यतिरिक्त त्या एका युवा मासिकाच्या संपादिका आहेत, youth curry नावाचा एक blog चालवतात आणि नामांकित कंपन्यांच्या त्या सल्लागारही आहेत. युवा पिढीच्या प्रश्नांवर त्यांनी खूप संशोधन केले आहे अनेक माध्यमातून त्यांनी हे प्रश्न समाजापुढे मांडले आहेत.

ह्या पुस्तकात रश्मी बन्सल ह्यांनी २० व्यक्ती अधोरेखित  केल्या आहेत, ज्यांनी नफा कमावणारे व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपली आहे. ह्या सर्वांनी जणू जगाला हे दाखवून दिले आहे की हजारो कोटींचा नफा कमवून त्यातून दोन चार कोटी सामाजिक संस्थांना दान देण्याऐंवजी सामाजिक काम करताना देखील तुम्ही नफा कमवू शकता, किंवा नफा कमवताना देखील हजारो लाखो वंचित समाजातील लोकांची खऱ्या अर्थाने उन्नती करू शकता.

रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या मुलांना घेऊन (आणि त्यावर सतत तीन वर्ष संशोधन करून) श्री सौ अहुजा ह्यांनी  प्लास्टिकच्या fashionable वस्तू बनविण्याचा कारखाना उभा केला, जिथे आज ७०० हून अधिक ह्यापूर्वी कचरा उचलून जेमतेम पोट भरणारे लोक काम करतात. त्यांचे आयुष्यमान संपूर्णपणे बदलून गेले आहे.

IIM अहमदाबाद मधून पास झाल्यावर अनेक मोठ्या MNC च्या नोकऱ्या नाकारणारा २५ वर्षाचा तरुण ध्रुव लाक्रा. काही तरी वेगळे करायचे आहे, पण काय ते कळत नाही शा संभ्रमावस्थेत असताना दारी एक मुलगा courier घेऊन येतो आणि एकही शब्द बोलता सही घेऊन निघून जातो. त्या रोज आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेत ध्रुवला काही तरी वेगळे करण्याचा मार्ग सापडला. त्याने Mirakle नावाची एक courier company उभी केली ज्यात आज ४०० मुकबधीर मुले मुली काम करत आहेत. जगातील सर्वात शांत ऑफिस असे तो गमतीने गर्वाने आपल्या ऑफिसचे वर्णन करतो.

अशा २० व्यक्ती, त्याचं आयुष्य बदलून टाकणारे प्रसंग किंवा आयुष्याची दिशा दाखवून देणाऱ्या घटनांनी भरलेले प्रवास वर्णन लेखिकेने आपल्या समोर मांडले आहे.

लेखिकेने पुस्तकाचे विभाजन तीन प्रमुख भागात केले आहे.

            Rainmakers  - ह्या भागात अशा सर्व लोकांचा उल्लेख आहे की ज्यांनी समाजाची उन्नती करता करता एकयशस्वीव्यवसाय उभा केला. त्यात उल्लेखनीय आहेत श्री बिंदेश्वर पाठक ज्यांनी मैला वाहून नेणाऱ्याना त्यातून मुक्त करण्याच्या उद्दिष्टाने सुलभ शौचालये सुरू करून गावोगावी संडास बांधून दिले. आज ती संस्था Sulabh International नावाने जगभर व्यवसाय करत आहेआसाममध्ये सरकारी नोकरीत रुजू असताना ULFA  दहशतवाद्यांनी श्री घोष ह्यांचा खून केला. स्वत:चे अश्रू पुसत श्रीमती घोष ह्यांनी रंगसूत्र नामक व्यवसाय उभा करून गावातील इतर विधवा महिलांना स्वत:च्या पायावर उभे रहायला एक साधन निर्माण केले

Changemakers - ह्या सर्व लोकांनी आपल्या स्वप्नाच्या दिशेने जवळ जवळ अंधारातच पहिले पाऊल पुढे टाकले आणि बघता बघता त्यातून एक क्रांती घडली. श्री माधव चव्हाण ह्यांच्या, “देशातील प्रत्येक  मुलास शिक्षण मिळालेच पाहिजेह्या प्रेरणेतून उभी राहिली प्रथम. श्री अंशू गुप्ता ह्यांनी ठरविले की देशातील गरीबात गरीब व्यक्तीकडेही अंग झाकायला कपडे हवेतच आणि त्यातून उभी राहिली गुंज.

Spiritual Capitalists - एखाद्या दैवी शक्तीने प्रेरित होऊन समाजासाठी काही तरी करून दाखवणारे व्यवसाय ह्या भागात चर्चिले आहेत. मधु दासा हा IIT चा विधार्थी नुकताच खूप निराश होऊन स्वित्झर्लंडहून भारतात परतला होता. निराशेच्या गर्द छायेत आत्महत्येच्या जवळ पोहोचलेल्या ह्या तरुणाने श्रीकृष्णाला साद घातली व त्यास झालेल्या दृष्टान्तातून उभी राहिली जगातील सर्वात मोठी mid day meal पुरवणारी संस्था - अक्षय पात्र. ही संस्था रोज दुपारी लाखो लोकांना सुग्रास व सकस आहार पोहोचवते. परिवार आश्रमाचे विनय लोखानी किंवा बेलूर मठाचे श्रीश जाधव ह्यांनाही असाच कुठला तरी दृष्टांत घडला व त्यातून उभ्या राहिल्या अशा काही संस्था की जिथे देवाची भक्ती समाज सेवेतून साकार होत आहे

ह्या पुस्तक रूपाने रश्मी बन्सल यांनी हळुवारपणे आपल्या समोर मांडल्या आहेत कुठल्यातरी अज्ञात वेडाने पछाडलेल्या २० व्यक्ती, त्यांच्या व्यवसायांची जडणघडण, त्यामागची विचारसरणी तळमळ आणि ते व्यवसाय उभे करण्याकरिता त्यांनी केलेली धडपडह्या वीसही लोकांनी स्वप्ने पाहिली, त्यातच ते जगले, गरज असेल तेंव्हा संशोधन केले आणि समाजातील अनेक प्रश्नांना छेदून जातील असे व्यवसाय उभे केले.

समाजसेवेचा विडा उचलेल्या प्रत्येक निर्माणीने हे पुस्तक जरूर वाचावे नफा कमविणे हा काही गुन्हा नाही आणि ते करतानाही सामाजिक गरजांचे भान आपल्याला कसे जोपासता येते हेच ह्यातून शिकावे.

सुनील चव्हाण, sunil3924@gmail.com


No comments:

Post a Comment