'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday 19 November 2012

तू जिंदा है...



निर्माण परिवाराचा लाडका सदस्य व मित्र सागर जोशी याचे १५ ऑक्टोबर २०१२ च्या दुपारी पुण्यात दुःखद निधन झाले. सागरच्या मागे त्याच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, भाऊ व वाहिनी आहेत. त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात निर्माण परिवार सहभागी आहे.

आज सागर आपल्यात नसला तरी त्याचं नेहमी हसतमुख असणं, दुसऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असणं, संगीत, नाटक येथपासून विविध सामाजिक प्रश्नांबद्दल त्याची समज व जाण, आपल्या शारीरिक मर्यादा सांभाळूनही रोजगार हमी योजना, मेळघाट धडक मोहीम, निर्माण निवड प्रक्रिया इत्यादी कामांत त्याचे योगदान देणं हे आज आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो...

No comments:

Post a Comment