'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 10 May 2013

वैभव ढेरे आणि अजिंक्य काळेचे UPSCच्या मुख्य परीक्षेत घवघवीत यश


वैभव ढेरे आणि अजिंक्य काळे (निर्माण २) यांना संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) मुख्य परीक्षेत (२०१२) घवघवीत यश मिळाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार संपूर्ण भारतात वैभवचा ३३५वा तर अजिंक्यचा ५३८वा क्रमांक आला आहे.

अजिंक्य काळे
वैभव ढेरे
मूळचा डॉक्टर असणाऱ्या वैभवला इंटर्नशिप-दरम्यान मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत बदल घडवून आणण्यासाठी प्रशासकीय सेवा हे उत्तम माध्यम असल्याचे लक्षात आले. मात्र पदासोबत मिळणारे अधिकार हे एक दुधारी अस्त्र असून त्यांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे असे वैभव सांगतो. अजिंक्यही डॉक्टर असून सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय अधिकारी असताना सरकारकडे मोठ्या प्रमाणात संसाधने असल्याचे तसेच सरकार अगदी तळागाळात पोहोचल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे रोजच्या जीवनात लहानसहान गोष्टींवर लोक सरकारवर अवलंबून असल्याने उपलब्ध संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्याची गरज जाणवली. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून ही जबाबदारी घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे अजिंक्यने ठरवले.
दोघांना कोणत्या सेवेमध्ये योगदान देण्याची संधी मिळेल हे लवकरच कळणार आहे. दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

No comments:

Post a Comment