'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 22 October 2013

स्त्रीभ्रूण हत्यांविरुद्ध हल्लाबोल !


नाटकातील एक क्षण !
स्त्रीभ्रूण हत्यांविरुद्ध कायदा असला तरी स्त्रीभ्रूणहत्येच्या घटना घडताना आज दिसतात. यावरून कायदा करण्याबरोबरच प्रबोधनाचे महत्त्व लक्षात येते. ही गरज ओळखून निर्माण नागपूर गटातर्फे या नवरात्री नागपूर शहरामध्ये विविध सार्वजनिक दुर्गा मंडळांच्या ठिकाणी स्त्रीभ्रूणहत्या या विषयावर नाटक सादर करण्यात आले.
या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला
या नाटकात शहरातील एका युवतीचा विवाह ग्रामीण युवकासोबत होतो. तिला दिवस जाताच सासरचे लोक तिच्या विरोधाला न जुमानता गर्भलिंग निदान करवून घेतात. मुलगी होणार हे कळताच तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणतात. यावेळी मात्र दबावाला न जुमानता माहेरी निघून येते. माहेरीच एका गोंडस मुलीला जन्म देते. पतीला ही बातमी कळताच तो तिच्या सासरच्या मंडळींसह मुलगी पहायला येतो. मुलीचा गोड चेहरा बघून सासरचे पाघळतात व त्यांना आपली चूक कळते. अशी या नाटकाची पटकथा होती. यानाटकामध्ये काल्याणी बारापतरे, गौरव पांडे, कुमार हतगडकर, कालिका गोरडे, अश्विनी दंडवते, अक्षय देशमुख, अनघा गोरडे, साक्षी पडेगावकर, आनंद जुमळे यांनी प्रमुख भूमिका केल्या. कुमार हतगडकरने या नाटकाची संहिता लिहिली, तर गौरव पांडेने दिग्दर्शन केले. पहिल्याच प्रयोगाला ३००० प्रेक्षक उपस्थित होते. इतर प्रयोगांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

स्त्रोत : रंजन पांढरे- pandhare.ranjan33@gmail.com

No comments:

Post a Comment