'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 8 March 2014

चॉकलेटचे पार्सल – ८ (मार्च २०१४)

या चॉकलेट पार्सल मध्ये:
नुकत्याच झालेल्या निर्माण ५.३ब शिबिरात अनेक तरुण डॉक्टरांनी खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचे ठरवले. पण खेड्यात का जायचे? तिथे सुरुवात कशी करायची? लोकांच्यात मिसळायचे कसे? कोणती पथ्ये पाळायची? स्वतःच्या अनुभवांतून विनोबांनी लिहिलेले हे विचार...
सध्या देशात निवडणुकीचे वारं वाहत आहे. डॉ. अभय बंग यांनी आजच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणारी मुलाखत निखिल वागळे यांना दिली होती. ही मुलाखत ‘अनुभव’ मासिकाच्या फेब्रुवारी २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाली होती.
बाजारपेठेत मिळणाऱ्या वस्तूंमध्ये औषध ही बहुधा सर्वांत जास्त जीवनावश्यक बाब आहे. कारण जीवन व मरण यांतील अंतर फक्त एक गोळी किंवा इंजेक्शनएवढे असू शकते. औषध ही अशी एकमेव क्रयवस्तू आहे जिच्याविषयीचा निर्णय ग्राहक स्वतः घेत नाही; या निर्णयाचा अधिकार आपण स्वतःहून तज्ञांच्या, डॉक्टरांच्या हाती सोपवला आहे. डॉक्टरांना रुग्णाची काळजी असली तरी औषधांचे पैसे डॉक्टरांच्या खिशातून जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. औषधांसाठी आपण खर्चिलेल्या प्रत्येक रुपयात औषध-निर्मिती कंपनी, तिचे वैद्यकीय प्रतिनिधी, औषध वितरक, किरकोळ विक्रेते व सरकार या सर्वांचा वाटा असतो. डॉक्टरांचा त्यात प्रत्यक्ष वाटा नसला, तरी आपली औषधे खपवण्यासाठी औषध कंपन्या डॉक्टरांना त्यांच्या विद्यार्थीदशेपासून खूष ठेवतात, हे सर्वविदित आहे.
भारतात ख्रिस्ती मिशनरी म्हणून आलेले वेरीअर एल्विन यांनी महात्मा गांधींसोबत काम करण्यासाठी मिशनरीचे काम सोडून दिले. मध्य भारतातील बैगास आणि गोंड आदिवासींसोबत त्यांनी काम केले. एका आदिवासी मुलीसोबत त्यांनी लग्नही केले. आदिवासी जीवनशैली आणि संस्कृती यावर अधिकारवाणीने बोलू शकेल अशा खूप कमी व्यक्तींपैकी ते एक होते. आदिवासी भागांत काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल त्यांनी अतिशय मार्मिक शैलीत पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या Leaves from the jungle: Life in a Gond village या पुस्तकाचा वैभव आगवणे याने परिचय देखील करून दिला होता. आपल्या जीवनावर एल्विन यांचा खूप प्रभाव असणाऱ्या रामचंद्र गुहांनी एल्विन यांच्याबद्दल लिहिलेला लेख...

पाश्चात्त्य भांडवलशाही ध्यान, योगासने इ. पौर्वात्य आध्यात्मिक संकल्पनांचा आधार घेताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे, मग तो google च्या कर्मचाऱ्यांसाठी असणारा ‘search inside yourself’ हा कोर्स असो किंवा EBay, Twitter, Facebook या कंपन्यांचे इतर उपक्रम असो. याचा त्यांना काही फायदा होतो का? सतत ताणतणाव आणि प्रलोभनांचा सामना करता करता थोडा वेळ शांतपणे विश्रांती घेतली तर फायदा होईल असे मानणे अवाजवी नक्कीच ठरणार नाही. मात्र ज्या आजारांचा सामना करायचा, त्याच आजाराचा हे उपाय भाग होत आहेत. ‘स्पर्धेत टिकण्यासाठी, rat race मध्ये पुढे जाण्यासाठी ध्यान करणे’ असे या उपायांचे स्वरूप दिसत आहे. पौर्वात्य आध्यात्मिकतेचा पाश्चिमात्य भांडवलशाहीवर प्रभाव पडण्याऐवजी उलटे होताना दिसत आहे. Economist मधील हा लेख

No comments:

Post a Comment