'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 10 January 2013

निर्माण पाच करिता महाराष्ट्रा तील तरूणाई सर्च मधे दाखल



         २९ डिसेंबर २०१२ ला निर्माण पाच बॅचचे पहिले शिबिर सर्च शोधग्राम येथे जल्‍लोषात सुरू झाले आहे. ५७ अवैद्यकीय युवांचा सहभाग असणारे हे शिबिर दि. ६ जानेवारी २०१३ पर्यंत चालणार आहे.  प्रथमच निर्माण मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ३५ जिल्ह्यांतून आलेले अर्ज तसेच शिबिरार्थ्यांमध्ये मुलांचे व मुलींचे असणारे समप्रमाण ही निर्माणच्या पाचव्या बॅचची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
दिल्लीच्या सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू अशा पार्श्वभूमीवर शिबीराची सुरूवात झाली. ‘दीपप्रज्वलन करताना आज आपल्या आतही एक ज्योत पेटायला हवी’ तसेच ‘मी जन्माला आल्यावर जे जग होते त्यापेक्षा अधिक सुंदर जग मी मारताना असेल यासाठी युवांनी प्रयत्नशील राहायला हवे’ असे आवाहन डॉ. अभय बंग (नायना) यांनी केले. ‘स्व पासून समाजाकडे व समाजापासून सृष्टीकडे’ हे सूत्र केंद्रस्थानी असणाऱ्या या शिबिरात उंची, रूंदी, खोली, वृत्ती व कालातीतपणाचे  प्रतीक म्हणून वटवृक्षाचे आरोपण करण्यात आले.
निर्माण ५ च्या वैद्यकीय युवांचे पहिले शिबीर २ ते १० फेब्रुवारी २०१३ दरम्यान संपन्न होत आहे. 

No comments:

Post a Comment