'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 4 April 2013

तिनका तिनका जर्रा जर्रा


सीमोल्लंघनच्या मागील अंकातील नंदा काकांचा स्तंभ वाचून अभिजीत सफईने त्यांना पाठवलेला मेल व त्यावर नंदा काकांचे उत्तर--

प्रिय नंदा काका,
सीमोल्लंघनमधील तुम्ही मांडलेल्या विचारांबद्दल धन्यवाद!
कविता (भावनांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या) आणि इतर साहित्यप्रकार (विचार/विवेकाचे प्रतिनिधित्व करणारे) याविषयीच्या तुमच्या लेखाबद्दल मला असे वाटते कारण मला चिन्मय युवा केंद्रात असे शिकवले गेले आहे की इतर साहित्यप्रकार (त्यांना विचार म्हणूयात) हे भावनांपेक्षा (कविता) वरच्या पातळीचे आहेत.
कारण, बुद्धी मनापेक्षा unbiased आहे. आपण मनाची मदत घेऊन निर्णय घेऊ तर तो भावनिक निर्णय होईल. याचा अर्थ असा नाही की निर्णय घेण्यासाठी मन वापरूच नये, फक्त ते बुद्धीच्या नियंत्रणाखाली असावे.
साम्यवादी कालखंडात कवितांची गुणवत्ता घसरते असं म्हटलं जातं. इथे आपल्याला सर्वसमावेशकता  व गुणवत्ता यांच्यात समतोल साधायला हवा. थोडक्यात, अपवाद असले तरी इतर साहित्यप्रकार (विवेकपूर्ण साहित्य) हे कवितेपेक्षा श्रेष्ठ आहेत असे मला वाटते.
अभिजीत सफई


प्रिय अभिजीत,
जरा वेगवेगळ्या तऱ्हांनी  भावना आणि विचार या जोडीला तपासू.
भावना उपजण्यावर आपलं नियंत्रण नसतं असा समज होतो, म्हणून "राग येतो", "भीती वाटते" इत्यादी. पण विचार "केला" जातो, कारण तो नियंत्रणात आहे असे वाटते. खरंतर हे सगळे ज्या मेंदूत होत असते, त्यात चेतापेशींची जंजाळे विद्युत-व्यवहारच फक्त करत असतात. मग भावना आणि विचार यांच्यात फरक काय? मला वाटतं की जिथे चेतापेशींचे व्यवहार ज्या तर्कक्रमाने होतात व तो क्रम आपल्याला समजतो, तिथे आपण "विचार केला" म्हणतो. पण चेताव्यवहार खूप गुंतागुंतीचे असतात. क्रम स्पष्टपणे सोडवणे सोपे नसते. त्यामुळे काही परिणाम आपण काही न करताच घडले असे वाटते. या झाल्या "भावना", आपण केल्या नाहीत, तर आपल्यात उपजल्या असे भासणाऱ्या. पण मुळात तर्कक्रमातली गुंतागुंत सोडली तर दोन्हीत फरक नाही.
बाय द वे, मुळात चेतापेशींचे विद्युतव्यवहार तर्कात चुकू शकतच नाहीत! अगदी radioactive, cosmic वगैरे किरणेच तर्क चुकवू शकतात.
 पण भावना हे क्रम न दिसणारे विचार असे म्हणण्यावर लोकांचा राग असतो. एकीकडे "कविमनाचे" लोक समजतात की विचार हे रुक्ष आणि भावना मात्र रसाळ. त्यामुळे "तू विचारी समजतोस न स्वतःला? मग तुला कविता समजणारच नाहीत!" अशी प्रतिक्रिया येऊ शकते. दुसरीकडे "कविता म्हणजे भावनिक तऱ्हेने घातलेला वैचारिक गोंधळ" असे मत येऊ शकते. मला वाटते की तू जे कविता वैचारिक साहित्याच्या खालीअसे समजतोस, तो असा दुसऱ्या प्रकारचा गैरसमज आहे. पण भावना म्हणजे न समजणारे विचार, आणि विचार म्हणजे समजू शकणाऱ्या भावना असे म्हटले, तर खराखुरा विवेक साधला जातो!
तर्कसंगती ओळखू न येण्याइतकी गुंतागुंतीची केव्हा होते? ती फार मूलभूत बाबींना स्पर्श करते तेव्हा. जीव वाचवणे, वंश वाढवणे ह्या उघडच मूलभूत बाबी आहेत. पण परोपकारही मूलभूत ठरू शकतो. तुम्ही Richard Dawkinsचं Selfish Gene पुस्तक वाचाल, किंवा Kin selection ही संकल्पना तपासाल तर तुम्हाला यावरच्या  काही संशोधनाची ओळख होईल. त्यामुळे एकूणच भावना आपल्याला काहीतरी करायला लावतात. पण अशी कृती करताना "आता काय करू?" असे प्रश्न पडतात. ते सोडवायला तर्कसंगत विचार लागतात, आणि असे वाटते की विचार हे भावनांचे नियंत्रण करताहेत. खरे तर विचार हे फक्त भावना समजून घेत असतात! (अभिजित! माझे तत्वज्ञ मित्र मला मारतील हे वाचले तर!)
असो. फार फिलोसॉफी झाडली!
नंदा

No comments:

Post a Comment