'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 5 April 2013

महामार्ग ग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ प्रांत कार्यालयावर



चौपदरीकरणात भूसंपादन करताना राष्ट्रीय महामार्गाच्या जागेवरील भोगवटाधारक, इमला मालक अतिक्रमण धारक आणि पुनर्वसन धारकांच्या नुकसान भरपाईबाबत हरकतीसह इतर मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दि. ११ रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
महसूल विभाग भुसावळच्या हद्दीतील प्रास्तावित राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात जाणाऱ्या सामूहिक आणि गावठाण तसेच सार्वजनिक वापरात असणाऱ्या जमिनी व शेती मोठय़ा प्रमाणात भूसंपादन झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत:
१.  भूसंपादन करताना शेतकरी, जमीन मालक, पक्षकार यांना संसदेत मंजूर होणाऱ्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार जास्तीत जास्त अधिग्रहण करताना भूमी अधिकार मिळावे आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई दलाल, एजंट व मध्यस्थाशिवाय मिळण्याचा मार्ग सुकर करावा
२.    उपविभागातील भुसावळसह इतर गावांना टोल मधून सूट मिळावी
३.    महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग संघ, एस.टी. महामंडळ इ. स्वरुपाच्या सर्वाजिनक वापराच्या जागा संपादन करताना त्यांचा वापर तेथे करुन त्या परिसरांचा विकास करुन प्रकल्पग्रस्तांना मदत करावी
४.  उपविभागातील ज्या गावातील गावठाण भूसंपादन करताना त्यांची सर्व भरपाई स्थानिक ग्रामपंचायतीला विकासासाठी मिळावी

No comments:

Post a Comment