'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 5 April 2013

लोकसहभागातून ग्रामविकास: ‘लोकसंघर्ष मोर्चा’ने आयोजित केलेल्या अभ्यासवर्गात खानदेश गटाचा सहभाग


 
‘लोकसंघर्ष मोर्चा’च्या वतीने दि. १९ व २०मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी गावांचा मेंढा(लेखा) च्या धर्तीवर विकास व्हावा, तेथील वन्यजीव विविधतेचे संरक्षण व्हावे व सहजीवनाची संकल्पना अधिक वृध्दींगत व्हावी यासाठी दोन दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत कल्पवृक्ष, पुणे या संस्थेच्या कार्यकर्त्या नीमा पाठक व त्याच्या सहकारी मीनल तत्पती यांनी मार्गदर्शन करताना गौणवनाचे संरक्षण, उपभोग्य संसाधनांचा शास्त्रोक्त पध्दतीने वापर व  संवर्धन ह्याकरीता लोकांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे, तसेच स्थानिक लोकांसोबत चर्चाविनिमय करून आपल्या जमिनीसोबतच आपण जंगल व तेथील जैवविविधताही अबाधित ठेवणे शक्य असल्याचे सांगितले. त्यासोबत मेंढ्यात होणाऱ्या विकासामध्ये मोलाचा सहभाग असणारे प्रा. विजय एदलाबादकर यांनी जैवविविधता नोंदणीपत्रक (People’s Biodiversity Register: PBR) याविषयी माहिती दिली व प्रत्यक्ष अमंलबजावणीविषयी मार्गदर्शन केले.
अभ्यासवर्गात यावल, रावेर व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एक गावासाठी प्रायोगिक तत्त्वावर कृतीकार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. अभ्यासवर्ग यशस्वी होण्यासाठी शाम पाटील, हर्षद काकडे, आनंद, भुषण, योगेश, विजय व स्वप्नील यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment