'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday 5 April 2013

आदिवासींना बोलते करण्यासाठी चर्चेऐवजी नाटक


आदिवासी जत्रेत सुमारे ४० गावांचे प्रतिनिधी एकत्र येऊन सर्चच्या कार्यक्रमाचा मागील वर्षाचा आढावा व पुढील वर्षाच्या नियोजनाविषयी चर्चा करतात. त्याआधारे पुढील वर्षाचा कृती-कार्यक्रम ठरवला जातो. मात्र गेल्या काही वर्षांच्या निरीक्षणानुसार मूलतः अबोल असणारे आदिवासी या चर्चेत म्हणावे तसे खुलत नाहीत. त्यामुळे  यावर्षीच्या जत्रेत कलाप्रिय आदिवासींचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने चर्चेऐवजी दोन interactive संगीत-नाटकांचे आयोजन करण्याची कल्पना नायनांनी सुचवली. सर्चमधील निर्माणींनी यात सहभाग नोंदवला. नाटकांमध्ये आदिवासींच्या आवडत्या चालींवर गाणी, विनोद, कलाकारांचा प्रेक्षकांच्यामधून व्यासपीठावर प्रवेश, कलाकारांचा प्रेक्षकांसोबत संवाद, आदिवासी गावात घडणारे प्रवेश (उदा. ग्रामसभा) इ. तंत्रांचा वापर करण्यात आला. आदिवासींसोबत कामाचा प्रदीर्घ अनुभव असणारे तुषारभाऊंनी नाटकाचे दिग्दर्शन केले.
आदिवासी भागातील सर्चच्या उपक्रमांचा आढावा हा पहिल्या नाटकाचा विषय होता, तर आदिवासींना नुकत्याच मिळालेल्या अधिकारानुसार बांबूकटाई व विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा विनियोग हा दुसऱ्या नाटकाचा विषय होता. नंतर झालेल्या गटचर्चेत आदिवासी मागील वर्षांपेक्षा जास्त खुलाल्याचे निरीक्षण आदिवासी नेते श्री. हिरामण वरखडे यांनी नोंदवले.

No comments:

Post a Comment