'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 8 November 2017

INSECTS – The dedicated workforce on Earth

Suvarna Khadakkar (NIRMAN 5) is pursuing her PhD in entomology from Nagpur University. She is telling us the interesting facts about the insects…

Surviving through every era and every period,insects are functioning day and night without claiming for any recognition. According to geological time scale, first insect appeared about 408 million years ago in the Silurian era along with jawed fishes and land plants. Insects appeared after the emergence of first vertebrates competing with them and surviving alongside. After the first appearance of insects they saw ages of fishes, amphibians, and reptiles come and go and now they are surviving through the age of mammals. They never dominated any epoch or period and never asked for any acknowledgement.
The ancient Egyptians were the first to record and document the importance of insects as suggested by the interpretations of their hieroglyphs written in both Greek and Latin. Earliest records shows that Egyptians recorded the behavior of dung beetles and made a connection between dung beetle and Sun. Egyptians had an insect God named ‘Khepri’. Egyptian hieroglyphs devoted to ‘Khepri’ are probably the oldest written ichnoentomological (paleontological traces of insects) reports on insects.
Insects! So advanced they are, that they did adapt the capacity to fly among invertebrates even before the birds could as vertebrates.
Simplicity percolates through the definition of insects too which recognize any living organism with three pairs of legs and two pairs of wings with a segmented body. With size ranging from millimeter to centimeter they have proved that your size never matter if you are dedicated to your work. None the less, ants can carry food multiple times of their weight and a mantis which can prey on hummingbird.
The insect world is a collage of organisms from tiny silverfish which play hide and seek with us while we are busy going through some old reference collection of books; the nasty appearance of cockroaches in our kitchen can irritate many; the humming of flies and mosquitoes which disturb our nap; a hairy caterpillar feeding voraciously on leaf of our favorite plant in the garden; a bug sucking on our pet dog which we love the most. Off course this picture is way annoying that one may want to get rid of all of them and why not?
But, have you ever thought what good insects are doing for all the living organisms including humans? Let me give you a glimpse of what insects are doing for us… We are because insects are… Tiny flies mingling in the flowers of various plants and crops are doing the most important work for us through which we are able to procure our grains and vegetables and fruits i.e., pollination. Wasps and other bugs act as parasites and predators controlling the pest population in various crop fields minimizing the usage of insecticides. Even, tiny dung beetles employ themselves clearing the excrement of man and cattle and burying it under the soil, the value of which is little realized because of the thoroughness and regularity through which this work is performed leading to minimize the occurrence of various parasitic diseases which could have raised havoc in public health. I will not say about honey and wax and silk and lac and many more which is very familiar information for all of us. Ecologically, the presence and absence of insects can act as an indication of the diverse flora and fauna of a particular area.
The most amazing feature of humans and of all mammals is to take care of their progeny i.e., ‘parental care’ which shows one of the highest degrees of emotional behavior. This behavior can be taken as peculiarity of mammals (such as humans, chimps, cats, dogs, etc.) and is only found in highly developed forms in animal kingdom. Such parental behavior is found in some orders of insects apart from social behavior of ants, bees and termites. A pair of beetle for example builds nest which is guarded by male or female of the pair. The pair prepares brood balls (made of dung) on which their young ones feed. Female choose male on the basis of his capacity to build nest and brood balls for the future generation.
Oh, and how can I forget the beauty which butterflies fill in our lives and gardens and terrace and where not? The coloration in butterflies and beetles is a way varied.
Want to hear about the adaptive nature of insects? Developmental stages of most of the insects comprise of a larval form and a totally different adult form. You may have seen various caterpillars feeding on leaves which after a definite interval of time pupate and emerge as a butterfly. Ever thought why is this so? Insects have managed to use the food resources so efficiently that a caterpillar feed on leaves of plants while the adult feeds on fruits. And there will be equal distribution of available food in adults and larva.
The social insects such as ants, bees, wasps, termites constantly remind us about the strength in unity.
Coming to an end of this article all I can say is this Earth belong not only to humans but each and every living form inhabited on Earth and the care, the respect which we show to other humans should also be shared with other life forms as well even as small as an insect. The next time you see an insect thank him for all the good they are doing for us. You can thank me too for sharing this info…:D 

Suvarna Khadakkar, NIRMAN 5

The Omnivore’s Dilemma – Michael Pollan

Omnivores are the animals who prefer both kinds of food- plant origin and animal origin. The best example would be us human beings. Omnivore’s dilemma is an argument which subtly forces us, humans, to think about the food origins to be on our food plate.
Everybody needs food to survive. But in today's world, many of us are unaware of the source of our food. Where does it come from? How did it reach our dining tables? And most importantly, WHAT SHOULD WE EAT FOR OUR DINNER? Some of these questions are answered in the book. But the book also offers you few questions to ponder upon.
Should we eat fast food like chips, KFC chicken, soft drinks or eat self-gathered cooked food like green vegetables from the farm or the animal you hunt yourself?  The former lets you open a stock can in no time, eat/ drink and gossip about politics, movies, family. The latter sharpens your skills, lets you talk about hunt stories and food origins but consumes huge time.
Eat meat? Or Stay vegetarian? The former leads to ecological balance and avoid a species’ population spurt; also it supports the life of animals who can't survive in wild these days. But later seems highly moral and seems more realistic to people who can't entertain the idea of killing.
Use fertilizers like nitrates? Or Stay with old methods of manure? The former damages the ecology but has miraculous agricultural speed. The latter method is slow but very eco-friendly.
Grow more corn? Or stop growing one crop in excess and practice rotation? A crop so seamlessly integrated into USA's daily life and economy that now it poses threats that were unknown to the superpower of the world.
Eat machine killed animals? Or savor the hunted 'game'? The former leads to quicker killing and food production in industries but has about 5 to 20% error of food processing a live animal before getting killed. The later brings us closer to the Earth and our real origins. We create a gratitude for our food and also get to know our food first hand. But it requires courage and skill. Also, it seems unrealistic in this era of population explosion where humans are more than the prey game.
Almost half the dogs in America will receive Christmas present, yet few of us ever pause to consider the life of a pig or chicken. An animal as intelligent as like dog easily becomes a Christmas ham. We tolerate this schizophrenia because the life of chicken has moved out from our view. We don't see them daily. This disappearance has opened a space in which there is no reality check on the sentiment or the brutality. Also, the question is not ‘can animals reason’? Or ‘can they talk’? But ‘can they suffer’?
Although vegetarian is a highly evolved human being; he has lost something along the way. Cultural traditions like a Thanksgiving turkey or a delicious chicken at relatives on a festival. These rituals linked us to our history on multiple lines of family and religion. Although we don't require vitamin B-12 from meat, we have been meat eaters for the most of our time on earth. This is reflected in the design of our teeth, structure of our digestion, and the way our mouth still waters at the sight of meat delicacies. Also, the human brain grew in size and complexity due to hunting, and around the hearth where the spoils of the hunt were cooked, human culture first flourished!
If you are in such dilemmas or want to know more about the food on your table and its dynamics, do give this book a try.
                                                                                                                          Sagar Bhalke

Tuesday 5 September 2017

अनुभव पावसाळी अधिवेशनाचा

या वर्षीचे पावसाळी अधिवेशन २४ जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान मुंबई येथे पार पडले. या अधिवेशनात आपला मित्र दिपक चटप (निर्माण ७) याने केलेला राज्यातील वेगवेगळ्या समस्यावरील संशोधनात्मक अभ्यास आमदार जयंत पाटील यांच्यामार्फत विधिमंडळात मांडला गेला. त्यासंदर्भातील महत्वाचे प्रश्न थेट संबंधित मंत्र्यांना विचारले गेले. तर जाणून घेवूया, दिपकच्याच शब्दात, त्याचा विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाचा अनुभव...

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्रात घडलेल्या ठळक घटनांकडे नियमित वृत्तपत्र वाचनातून माझे लक्ष होते. या घटनांवर राज्यातील विधानसभेत चर्चा व्हावी असे मला वाटत होते. तेव्हा मला वाटलेल्या अत्यंत महत्वाच्या १० ठळक घटनांची यादी केली. ती यादी अधिवेशन सुरु होण्याअगोदर आमदार जयंत पाटील यांना दाखवली. त्यातील ६ घटनांवर राज्याच्या विधिमंडळात चर्चा होऊ शकते. तेव्हा यावर विस्तृत अभ्यास करून नेमकी माहिती आणि व्यवहार्य मागण्यांचा अभ्यास करण्याची सूचना त्यांनी मला दिली. हे आवाहन मी पेलू शकेल काय? ही भीती मनात होतीच पण कृतीतूनच मार्ग मिळतो तेव्हा ‘कर के देखो’ या तत्वाची आठवण झाली.
त्यामुळे  भायखळा तुरुंगातील मंजुळा शेटे प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, मुंबई विद्यापिठाचा भोंगळ कारभार, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, राज्यातील महानगरपालिकांचे प्रश्न, राज्यातील वाढत्या झोपडपट्ट्या इत्यादी विषयांवर अभ्यास करण्याची संधी मला मिळाली.
 विधिमंडळाचं कामकाज प्रत्यक्ष बघताना मला जाणवले की आपण TV, वृत्तपत्रांत जे बघतो त्यातून सत्ताधारी आणि विरोधक हे दोन टोक वाटू लागतात. यांची सतत एकमेकांवर कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप चालू असतात असं दिसतं. परंतु सभागृहातील चित्र मात्र वेगळंच होतं. अत्यंत खेळीमेळीने, मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा होत होती. समस्यांवर उपाययोजना चर्चिल्या जात होत्या. काही ठोस पावलं उचलण्यासाठी आदेशही दिले जात होते. सहसा गोंधळामुळे कामकाज कमी होते परंतु यावेळी २-३ अपवाद वगळता कामकाज जास्त झालं.
विधिमंडळातील महिलांचं प्रतिनिधित्व नाममात्र वाटलं. महिला आमदार फारश्या बोलत नाही, चर्चेत नाममात्र सहभागी होतात असे दिसले. यशोमती ठाकूर, पंकजा मुंडे, नीलम गोऱ्हे, वर्षा गायकवाड, चित्रा वाघ यांसारख्या फार कमी महिला चर्चेत सहभागी होतात. केवळ महिलांचं सांख्यिक प्रमाण वाढवून चालणार नाही तर त्याचबरोबर त्यांचा विधिमंडळ कामकाजातील सहभागसुद्धा वाढविला पाहिजे असे मला जाणवले.
पावसाळी अधिवेशनातील कामकाज बघितल्यानंतर मला असे जाणवले की विधिमंडळ सदस्य विधीमंडळात विविध समस्यांवर चर्चा करू शकतात, त्यावर उपाययोजना शोधू शकतात कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन काटेकोरपणे केलेच पाहिजे पण त्याच बरोबर आपण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे की कोणीच ‘सदा सर्वकाळ सर्वज्ञानी’ नसतो किंवा जनतेचे प्रतिनिधी म्हणून एकदा निवडून दिल्यानंतर ५ वर्ष जनसामान्यांचे सर्वच प्रश्न सोडविण्याचे कर्तव्य जनप्रतिनिधींचेच असते असे नाही. त्याला नागरिकांनीही हातभार लावायला हवा. नागरिक म्हणून आपली भूमिका नागरिकांनीसुद्धा पार पाडायला हवी.
नागरिकांनी हातभार लावायला पाहिजे म्हणजे काय? तर, दैनंदिन जीवनात नागरिक म्हणून आपण विविध समस्यांना सामोरे जात असतो. उदाहरणार्थ, महिलांना सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनगृह नसणे, रस्ता नसणे किंवा असला तर त्यात खड्डे असणे, शेतकरी असाल तर पीकविमा किंवा अन्य योजनांचा वेळेवर लाभ न मिळणे, कामगार असाल तर कमी भत्ता मिळणे किंवा अधिक वेळ काम करायला लागणे, युवक असाल तर स्थानिक असूनही स्थानिक कारखान्यांत रोजगार न मिळणे अशा विविध समस्यांना नागरिक  सामोरे जात असतात तेव्हा अशा समस्यांचा तटस्थ अभ्यास करून त्याची सांख्यिक माहिती काढणे, त्याचे स्वरूप जाणून घेणे, त्या समस्येचा पाठपुरावा करणे आणि मग ही संपूर्ण माहिती नेमक्या शब्दात आपल्या जनप्रतिनिधीपर्यंत पोहचवणे अशा वेगवेगळ्या पातळींवर नागरिक म्हणून जी कुठली कृती करू शकतो, ती कृती करणे म्हणजे नागरिक म्हणून हातभार लावणे होय. अशी कृती आपण सातत्याने केली पाहिजे असं मला वाटले.
निर्माणी वेगवेगळ्या समस्यांवर प्रत्यक्ष काम करत असतात तेव्हा हे काम करत असताना समस्यांच्या निराकरणासाठी काही उपाययोजना शासनाला सुचवायच्या असतील तर उपाययोजना सुचविताना त्यासोबत समस्येचे स्वरूप, संशोधनात्मक माहिती यांची जोड असली तर अधिक प्रभावी मागणी समोर येते असे मला वाटते.


     दीपक चटप, निर्माण ७            
                                                                                                            deepakchatap27@gmail.com

गडचिरोलीचे ‘परिवर्तन दूत’

संकेत आहेर आणि गजानन अंभोरे (दोघेही निर्माण ७) गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुक्यामध्ये असलेल्या आंबटपल्ली आणि कोठारी ह्या दोन ग्राम पंचायतमध्ये मुख्यमंत्री ग्राम विकास फेलो म्हणून काम करत आहेत. SocialCops मध्ये काम करणारी निर्माण ७ ची आपली मैत्रीण पूजा वेरुळकर ही नुकतीच त्यांच्या गावाला भेट देऊन आली. तिथे तिला काय दिसलं, ते तिच्याच शब्दात...

मी SocialCops नावाच्या कंपनीत काम करते. ही कंपनी डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या संस्थाना IT सपोर्ट पुरवण्याचं काम करते. आमच्या टीमने बनवलेला डॅशबोर्ड ग्राम विकास योजना बनवण्यासाठी ह्या फेलोजना किती उपयोगी आहे हे बघण्यासाठी मी ह्या दोन ग्राम पंचायतींना भेट देण्याचे ठरवले. संकेत आणि गजानन ह्या दोघांची गावे लगतच, पण दोन्ही गावी बस जात नाही. चंद्रपूरपासून २ तासाचा प्रवास करून नुकत्याच रोवलेल्या धानाच्या सुंदर शेतांमधून आणि मग गडचिरोलीच्या दाट जंगलामधून मी आणि संकेत त्याच्या गावी जाऊन पोहोचलो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ह्यांच्या Village Social Transformation Mission अंतर्गत २०२० पर्यंत १००० गावांना आदर्श गाव बनवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विविध CSR आणि Foundations च्या मदतीने हे टार्गेट पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ह्यावर्षी जवळपास २०० मुख्यमंत्री फेलोजची निवड करण्यात आली. हे फेलोज गावात राहून त्या गावाला आदर्श गाव बनवण्यासाठी काम करणार आहेत. Root level ला काम करण्याची ही उत्तम संधी असल्याने बऱ्याच निर्माणींनी ही फेलोशिप जॉईन केली आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध गावांमध्ये राहून त्या गावाच्या विकासासाठी ते काम करत आहेत. २-३ आठवड्याच्या यशदाच्या प्रशिक्षणानंतर ते गावात राहायला गेले.
गावाच्या ग्राम पंचायतची इमारत सुंदर होती. बसायला महागड्या खुर्च्या होत्या. बाहेर ग्रामसेविकेची कार उभी होती. मी कल्पना केलेल्या गडचिरोलीच्या आदिवासी गावातील ग्रामपंचायतसारखी ही मुळीच नव्हती. सरपंच आणि ग्रामसेविकेशी संकेतने ओळख करून दिली. गाव PESA अंतर्गत येत असल्याने सरपंच आदिवासी होत्या. आतापर्यंत मी पाहिलेले सरपंच म्हणजे स्वतःला गावाचे राजे समजणारे. पण ह्या सरपंच म्हणजे एका साधारण आदिवासी बाईसारख्या. त्यांच्याशी बोलताना एकूणच त्यांचे अज्ञान आणि गावाच्या विकासाबद्दल उदासीनता दिसून आली. ग्रामसेविकांचा पैशाचा घोटाळा उघडकीस आल्याने तिचेही कामास काही सहकार्य दिसत नव्हते. उदासीन सरपंच, भ्रष्ट ग्रामसेविका ह्या सगळ्यांसोबत काम करणे मला खूप आव्हानात्मक वाटलं आणि हे सगळं सांभाळून गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या संकेतचं कौतुक वाटलं. त्याचं राहायचं ठिकाणही खूप साधारण. एक छोटीशी खाट आणि थोडं सामान एवढंच काय ते फर्निचर. गावातील बहुतेक घर कच्चीच होती. घरांमध्ये टॉयलेट असणं तर दूरच. विकास कामांवर खर्च करण्यापेक्षा वेशीवर कमान बनविणे किंवा महागड्या खुर्च्या घेण्यात खर्च झालेला दिसत होता.  
संकेत म्हणाला, “मी काम करत असलेल्या ग्रा. पं. आंबटपल्लीचा आराखडा गडचिरोली जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट ग्राम विकास आराखडा म्हणून निवडला गेला.  हा आराखडा महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनच्या (व्हीएसटीएफ) गव्हर्निंग कौन्सिलच्या तिसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि इतर CSR हेड यांना सादर करायचा होता. शेवटी सादरीकरणाच्या आधारावर सर्व जिल्ह्यातून ज्याला चांगले मार्क्स मिळतील त्या ग्रामपंचायतीला ५ लाखाच बक्षीस होतं. मला चांगलं सादरीकरण न करता आल्यामुळे बक्षीस यवतमाळ जिल्ह्यातील ग्रा. पं. ला भेटलं. यासर्व प्रक्रियेतून जाताना, एका गोष्टीचे वाईट वाटलं की, माझ्यात उत्कृष्ट सादरीकरणाचे कौशल्य नसल्याने माझ्या गावातील लोकांसाठी ५ लाख रुपयांचे बक्षिस घेऊन येता नाही आलं. आणि सर्वात महत्त्वाची शिकवण भेटली कि, चांगलं काम करता-करता ते मला चांगल्या पद्धतीने मांडतासुद्धा यायला हवे.”
तिथून पुढे आम्ही दाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने भर पावसात गजाननाच्या गावी गेलो. तो त्याच्या क्वार्टरवर घेऊन गेला. तिथे मोबाइलला नेटवर्क नाही. त्यामुळे यूट्यूब, फेसबुकसारखी करमणूक तर नाहीच. एक साधा रेडिओ ठेवलेला होता कोपऱ्यात. त्यावर छान जुनी गाणी लावून गजाननने आमच्यासाठी खास बिनदुधाचा चहा बनवला. एक दिवस इंटरनेटशिवाय न राहू शकणाऱ्या मला, ‘अशा जंगलातील गावात राहण्याचा गजाननला  कंटाळा येत नसेल का?’ असा प्रश्न पडला. मग गजानन त्याच्या कामाबद्दल सांगत होता.
प्रत्येकाच्या ग्राम पंचायतमध्ये ३-४ गाव. रोज वेगळ्या गावांना भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर आवश्यक कृती करणे हे त्यांचं रोजच काम. गावाच्या विकासासाठी बऱ्याच योजना असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीमध्ये खूप त्रुटी आहेत. गावात गरजूंपेक्षा ग्राम पंचायत सदस्यांच्या ओळखीच्या लोकांना जास्त लाभ मिळतात. हे टाळण्यासाठी आणि गरज आहे त्यांनाच लाभ मिळावा ह्यासाठी ह्या फेलोजनी सुरवातीचे २ महिने घरोघरी जाऊन सर्वे केला. त्यातून मिळवलेल्या डेटाच्या आधारे त्यांनी एक ग्राम विकास योजना बनवली आहे. बरेच फेलोज नवखे असल्यामुळे ग्राम विकास योजना कशी बनवतात ह्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यासाठी त्यांना फारसे ट्रैनिंग किंवा रिसोर्सेस मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच जवळपास एक महिना सर्वे डेटा analysis, गावकऱ्यांसोबत चर्चा आणि योजनांचा अभ्यास करून ही ग्राम विकास योजना बनवली आहे.  आता उर्वरित कालावधीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे केलेलं नियोजन implement करण्याचं काम आहे. 
खरंतर गडचिरोलीच्या जंगलातल्या दोन आदिवासी ग्राम पंचायतमध्ये त्यांना सोडून दिलंय आणि आता ह्यांचा विकास करा असं सांगितलं असं दिसत होतं. पण कसा करायचा ह्यासाठी ना काही सपोर्ट ना काही प्लॅन. तुम्ही ठरवा काय करायचं कसं करायचं. Rural Development, community interaction चे कितीही पेपर्स वाचले, अभ्यास केला आणि औपचारिक प्रशिक्षण घेतलं तरीही प्रत्यक्ष गावात काम करायला गेल्यावर त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. त्यामुळे गावात काम करताना ह्या फेलोजना बऱ्याच अडचणी येतात. राहायचं घर शोधण्यापासून उच्च अधिकाऱ्यांच्या राजकारणापर्यंत सगळंच.
अशा परिस्थितीमध्ये  काम करणं किती अवघड आहे हे त्यांना प्रत्यक्ष भेटून आल्यावरच कळतं. ‘Suffering में ही meaning  है’ हे फेलोज प्रत्यक्ष जगताना दिसतात. म्हणूनच बाहेर रिमझिम पावसाच्या आवाजात, रेडिओवरची जुनी गाणी ऐकत आणि काळा बिनदुधाचा चहा पीत आपल्या दोन निर्माणी मित्रांच्या कामाबद्दल ऐकताना मला अशा चेंज मेकर्सच्या कम्युनिटीचा भाग असल्याचा अभिमान वाटला!
                                                                                                                                                                                                                                                                         पूजा वेरुळकर, निर्माण ७
                                                                                                    poojaverulkar@gmail.com

पुस्तक परिचय-आज भी खरे हैं तालाब :अनुपम मिश्र

मध्य प्रदेश के करड़ी नामक गाँवमें मैं महिला बचत गट (SHG) के एक मिटिंगमें गया था। वहाँ एक ५५ - ६० साल के अम्मा के पैरों पर एक चित्र को गुंदा हुआ देखा। कुछ रेखाओं में बना यह चित्र 'सीता - बावड़ी' का था। अनुपम मिश्रजीद्वारा लिखित आज भी खरे हैं तालाब में सीता-बावड़ी या तालाब को शरीर पर गुंदने की प्रथा का वर्णन मिलता है। उन अम्मा के पैरोंपर गोंदा हुआ बावड़ी का चित्र बताता है कि तालाबों को पुराने लोग कितना महत्व देतें थें।
हजाह के वज़ीर असाफजाह जब दक्षिण की ओर सेना लेकर निकले थे, तो सेना का सामान उठाने हेतू लाखा बंजारा को (जिस बंजारे के पास एक लाख गाय-बैल हो) साथ लिया गया था। इतनी बड़ी सेना, लाख से ज्यादा पशु और पशुओं की देखभाल करने वाले बंजारा लोग जहाँ रुकेंगे वहाँ उन्हें कितना पानी लगेगा यह आप सोच सकते हो। जहाँ भी पानी कम मिलता वहाँ यह बंजारा लोग अपना कर्तव्य समझकर तालाब बना देते। ऐसे ही एक लाखा बंजारे ने मध्य प्रदेश में सागर नामक एक विशाल तालाब बनाया और उस शहर का नाम ही सागर हो गया। दुखद बात है कि आज यह तालाब प्रदूषित हो गया है और छोटा हो राहा है। ऐसे कुछ ऐतिहासिक घटनाओं का वर्णन ‘आज भी खरे है तालाब’ में मिलता है।
तालाब बनाने वालों को राजा की तरफ से लगान माँफी भी मिलती। कुछ पंचायतों में किसी से सजा के रूप मे वसूली गई राशि को तालाबों के मरम्मत मे लगा दिया जाता। तो कही गड़ा हुआ कोष प्राप्त होने पर राजा तालाबों के निर्माण हेतू उस कोष का उपयोग करते थे। समाज को जीवन देने वाले तालाबों को लोग निर्जीव कैसे मान लेते? तालाबों के पास ‘थूकना मना है’, ‘जूते पहनकर आना मना है’ इस तरह के सूचना फलक लगाए बिना ही लोग आदरभाव से इन नियमों का पालन करते थें। जब भी अकाल आता तो समाज अपना कर्तव्य मानकर तालाब निर्माण मे लग जाता। कम बरसात वाले राजस्थान के इलाकों में भी पानी की समस्या नहीं थी। ‘उस शहर में तो २२६ तालाब हैं’ इस तरह बड़े शहर या अबादी नापने से तालाबों को जोड़ दिया जाता था। आज तालाब सूख चुके हैं क्योंकि तालाब बनाने वाली संस्कृति और परम्परा भी सूख चुकी है।
इस किताब के ‘निव से शिखर तक’ नामक पाठ में तालाबों की छोटी से लेकर बड़ी तांत्रिकी हिस्सों का भी अभ्यास पढ़ने को मिलता है। दक्षिण में तालाबों के साथ-साथ उप्पार और वादी मान्यम्, खुलगा मान्यम्, पाटू मान्यम्, उर्नी मान्यम्, कैरी मान्यम्, वयक्कल मान्यम् आदी जिम्मेदारीयाँ भी बनती। तालाब की टूट-फूट ठीक करना, मरम्मत करना, घरों तक पानी लाना, संयोजन, नहरों की देखभाल ऐसी जिम्मेदारीयों को आपस में बाँटा जाता था। मैं इसे आज के सहभागी सिंचाई प्रबंधन (Participatory Irrigation Management) के योजना से तुलना कर देख पा रहा हूँ। सहभागी सिंचाई प्रबंधन जैसी योजना में भी इन्ही तरह से समितियाँ बनाकर जिम्मेदारियों को बाँटा जाता है। किसी लिखित स्वरूप मे न होकर भी पहले सभी कामों को निभाया जाता था और आज लिखित स्वरूप मे (So called Guidelines) होने के बावजूद भी योजनाएँ असफल दिख रही है। नहर के आखरी किसान तक पानी कभी पहुँचता ही नही
एक जमाने में देल्ली में ३५० तालाब थें। आज यहाँ पर सभी को नल योजना से पानी मिलता है। इसी तरह बड़े शहर दूर गाँव में बने तालाबों का पानी ले रहे हैं या फिर भूजल का उपयोग होता है। पुराने जमाने में समाज और राजा मिलकर तालाबों का रखरखाव करते क्यूँकि तालाबों से समाज स्वामित्व की भावना से जुड़ा हुआ था। आज तालाबों को पी.डब्ल्यू.डी के हवाले कर इस स्वामित्व की भावना को खत्म कर दिया है। १९९० में मध्य प्रदेश के देवास शहर में सूखा पड़ गया। पानीके कामके बजाय १० दिन तक दिन-रात रेल्वे स्टेशन पर काम किया गया। फिर इंदौरसे रेल मार्गसे पानी लाया गया। तालाबों पर काम और उनका रखरखाव कर पाए तो रेलसे दूधके भावमें पानी लाने की जरूरत नहीं पड़ती। इस गलती की सजा तो २०१५ में लातूर को भी देखने को मिली है। सभी बड़े शहरों को पानी चाहिए पर पानी दे सकने वाले तालाब नहीं। पानी, तालाब, समाज का इतिहास उदाहरण के साथ इस कीताब में मिलता है।
इस कीताब के पहले पाठ का आखरी वाक्य है कि ‘क्योंकि लोग अच्छे-अच्छे काम करते जाते थें’। और आखरी पाठ का आखरी वाक्य कुछ इस तरह बन जाता है -
कुछ कानों में आज भी यह स्वर गूँजता है – ‘अच्छे-अच्छे काम करते जाना’।

                                                                                               प्रतिक उंबरकर, निर्माण ६
                                                                                             pratik.umbarkar8@gmail.com

Saturday 1 July 2017

'कर के देखो' चा मंत्र

जयश्री कुलकर्णी, निर्माण ७ चे शिबीर झाल्यावर, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ‘वयम’ या संस्थेसोबत प्रायोगिक तत्त्वावर काम करण्यासाठी गेली. ‘वयम’ ही संस्था जव्हारमधील आदिवासींच्या हक्कांबाबत जनजागृती आणि लोकशिक्षणाचे काम करते. तसेच महिलांसोबत आणि लहान मुलांसोबत त्यांचे इतरही काही उपक्रम चालतात. गेल्या तीन महिन्यात जयश्रीला ‘वयम’सोबत काम करताना आलेले अनुभव ऐकुया तिच्याच शब्दात...

निर्माण ७.१ चे शिबीर झाल्यापासून पुढे काय? याचं विचारचक्र चालूच होतं. फार झालं बोलणं – आता काम सुरू केलंच पाहिजे असं मार्च अखेरीपर्यंत ठरवलं आणि जव्हारला 'वयम'मध्ये काम करायला सुरवात केली. पालघर जिल्हा महाराष्ट्राची उत्तर सीमा. त्यातला जव्हार तालुका हा पूर्ण आदिवासी लोकवस्ती असणारा!
माझी आत्तापर्यंतची जीवनशैली आणि जव्हारमधली जीवनशैली यात ब-यापैकी तफावत होती. त्यामुळे इथं आपण कसे टिकणार? जमेल का आपल्याला? असे प्रश्न वासून उभे होते. कामाची सुरूवात मुलांबरोबर झाली. बिन बुका या शिका प्रकल्पाअंतर्गत पाड्यांत गंमत शिबीरं घ्यायची होती. पाड्यात जाऊन रहाणं हा आता कामाचाच भाग असणार होता. पहिल्याच दिवशी सुळ्याच्या पाड्यात रहायला होते. महिला का असेनात पण अनोळखी व्यक्तींच्या शेजारी झोपताना मनात असंख्य प्रश्न होते. वर पंखा नाही, मिणमिणता बल्ब होता फक्त. ती रात्र फक्त छताच्या लाकडी फळ्यांकडे बघत या कुशीवरून त्या कुशीवर वळत कशीबशी काढली. घरचा comfort  zone सोडून मी इथे का आलीये? काय ठेवलंय आयुष्यात पुढे? एकूणच - प्रचंड भिती, घुसमट, गोंधळ, प्रश्न यांची दलदल! पण त्याच क्षणी- हा मार्ग आपण स्वत:हून निवडलाय. असे खाचखळगे येणारच. हीच घडण - खरी परीक्षा आहे आपली असं समजावत होते आणि तथ्यही होतं त्यात, हे पुढच्या काही दिवसातच समोर येऊ लागलं, पटायला लागलं.


मुलांची निरागसता, त्यांची भडक नसणारी चमक, त्यांचं माझ्याभोवती सतत कोंडाळं करणं या सगळ्यामागे झाकली जाणारी त्यांची dark background आत्ता आत्ता लक्षात यायला लागलीये. या लहानग्यांबरोबर काम करताना मलाही स्वत:चे आजतगायत माहीत नसलेले पैलु उलगडायला लागलेत. इथला प्रत्येक दिवस नवा, ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे गोष्टी घडतीलंच असं नाही. मग ती महिला बचत गटाची मिटिंग असो, PESA ची मिटिंग असो, मुलांना जमवणं असो. त्यामुळे निराशा आली तरी संयम ठेवणे आलेच. अजूनही पाड्यात गेल्यावर कधीकधी संडासातच आंघोळ करावी लागते, रात्री डास ही चावतात – भिती वाटते; पण थोडीशी मनाची तयारी करून गेलं की गोष्टी सोप्या, सुसह्य होत आहेत.
बिन बुका या शिकाद्वारे मुलांना मागील वर्षी त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशी खेळणी दिली होती. त्या खेळण्यांची मालकीही त्यांचीच. हीच मुले पुढे त्यांच्या जल जंगल जमिनीची मालकी घेतील. त्याचीच ही पायाभरणी! मुलांमधील नेतृत्व गुण वाढणे, संघटन वाढ, कल्पनाशक्ती या सगळ्याच गोष्टींना वाव देणारी शिक्षण पध्दती उभी करण्याची गरज आहे. ज्या पध्दतीत मुलं व्यक्त होऊ शकतात, आपल्या भावनांची मांडणी करू शकतात, विचार करून त्यावर कृती करू शकतात अशा पध्दतीची रचना करणं हा माझ्या कामाचा पुढचा महत्वाचा भाग असेल.


छोट्या संस्थेत पडणारी लहान-मोठी कामे, लोकांशी स्वत:हून संवाद साधणे, एखाद्या पाड्यात श्रमदानासाठी जाणे या सगळ्याकडेच, कुठल्याही कामाला कमी न लेखता एका नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज मला प्रकर्षाने जाणवली. इथे आल्यापासून इथल्या मूलभूत जीवनशैलीचे अनेक बारकावे अनुभवायला मिळाले. स्त्रिया कसलीही लाज न बाळगता सर्वांदेखत आपल्या मुलांना दूध पाजतात, पुरूष स्वयंपाक करतात, स्त्रिया घरं बांधतात. एकूणच स्त्री-पुरूष समानता, स्त्रीचा मान, निसर्गाशी जवळीक, त्याचे रक्षण हे सगळंच किती सहज, जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखं घडतं. हीच नाहीत का निरोगी समाजाची लक्षणं?
कधीकधी आपण एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जातो तेव्हा इथे कसं आपल्या गावासारखं/ शहरासारखं नाही या नजरेतून पाहतो; पण ही तुलना, आपल्या समजुती काही काळासाठी बाजूला ठेवल्या तर नवं ठिकाण आपल्याला बरंच काही देऊन जातं!!!
जयश्री कुलकर्णी, निर्माण

CSR समजून घेताना


पापक्षालन कायदा”, “यांचे पैसे घेतले तर यांच्या विरुद्ध बोलायची सोय राहणार नाही”, “सामाजिक काम की कामाचा फक्त दिखावा फोटो सेशन पुरता”, “सामाजिक काम देखील आता प्रोफेशनल होणार”, “एवढा पैसा योग्य हातात पडेल तर खरंअसं काही बाही... CSR हा शब्द ऐकला की सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जनांत अशा प्रतिक्रिया चटकन उमटतात. मी देखील तसं पाहायला गेलं तर याच बाजूचा असल्याने या प्रतिक्रिया बरोबर की चूक, नाही हो ते तेवढेही वाईट नाहीत, अशी मत मांडण्याच्या फंद्यात न पडता हा नवीन CSR कायदा नक्की आहे तरी काय? हे विस्कटून पाहण्याचा प्रयत्न करतो. कारण चांगला वाईट जसाही असो हा नवा कायदा (खरं तर कायद्याचा एक भाग) सामाजिक क्षेत्राच्या सर्वच आयामांवर प्रभाव टाकणारा आहे; मग तो सामाजिक क्षेत्रात येणारा पैसा असो, या पैशाचे योग्य नियोजन असो, वा उद्योग क्षेत्राच्या सामाजिक क्षेत्राकडून असणाऱ्या अपेक्षा असो... तर आता हे पार्श्वभूमीचे पाल्हाळ पुरे करून विषयाला सुरवात करतो.
तर CSR कायदा समजावून घ्यायचा तर आधी तो ज्याच्या पोटात आहे तो Companies Act काय आहे ते जाणून घेऊयात.

Companies Act 2013 –
भारतातल्या कंपन्या (विशेषतः व्यक्तिगत कंपन्या) कशा चालाव्यात याचे निकष सांगणारा कायदा म्हणजेच Companies Act 2013. सन १९५६ मध्ये अस्तित्वात आलेल्या या कायद्यात २०१३ साली काही महत्वाचे बदल करण्यात आले. त्यातील आपल्या कामाचा बदल म्हणजे Section 135 – जो भारतातील उद्योगांची सामाजिक बांधिलकी उधृत करतो. खरं तर १९६५-६६ साली झालेल्या एका सेमिनारमध्ये उद्योग क्षेत्राची सामाजिक बांधिलकी काय असावी याबद्दल पहिल्यांदा चर्चेला सुरवात झाली. पण सध्या जो कायदा अमलात आला आहे त्याची पायाभरणी मात्र २००९ साली Ministry of Corporate Affairs (MCA) ने CSR संर्भात घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांपासून (मराठीत – guidelines) सुरु झाली आणि वर्ष २०१३ साली लोकसभा आणि राज्यसभेत पारित झाल्यावर ३० ऑगस्ट २०१३ साली हे बदल कायदा म्हणून लागू झाले.
खरं तर आपण निर्माणमध्ये नेहमी विचारतो त्या ‘म्हणजे काय’ आणि ‘कसं मोजणार’ या प्रश्नांचं सरकारी चौकटीतील उत्तर म्हणजेच कायदा. तर उद्योगांनी सामाजिक बांधिलकी सांभाळली पाहिजे असं जेव्हा सरकार म्हणतं, तेव्हा म्हणजे नक्की कोणी? काय केलं तर चालेल काय चालणार नाही? काम झालं हे कसं मोजणार? या सर्व प्रश्नांचा विस्ताराने उलगडा सेक्शन १३५ मध्ये केलेला आहे. यातील काही महत्वाच्या गोष्टी समजावून घेऊ -

हा कायदा कोणाला लागू होतो?
शेजारील आकृतीत दिल्याप्रमाणे section 135 अशा कंपन्यांना लागू होतो ज्यांची, एकूण वार्षिक उलाढाल १००० करोड रुपये (वा अधिक) आहे, किंवा ज्यांची एकूण मालमत्ता ५०० करोड रुपये (किंवा अधिक)आहे, किंवा, ज्या कंपनीचा निव्वळ वार्षिक नफा ५ करोड रुपये (किंवा अधिक) आहे. अशा सर्व उद्योगांना त्यांच्या नफ्यातील किमान २ % रक्कम सामाजिक कामांत गुंतवणे सक्तीचे आहे.

हे कामकाज कसे चालेल?
तर हा कायदा ज्या कंपन्यांना लागू होतो त्यांनी किमान ३ संचालक (Directors) असलेली समिती (Committee) स्थापन करणं गरजेचं आहे. या समितीमधील किमान एक जण स्वतंत्र संचालक असेल. या समितीच्या रचनेबद्दल कंपनीच्या संचालक मंडळाच्या अहवालात (Board’s Report) सविस्तर माहिती देणं बंधनकारक आहे.

या समितीची मुख्य कामे तीन
*       कंपनीसाठी Corporate Social Responsibility Policy बनवणे, त्यामध्ये कंपनीने कायद्यातीलschedule VII’ ला अनुसरून कोणती कोणती कामे करावीत याची माहिती दिलेली असेल. ही Policy कंपनीचे कामकाज पाहणाऱ्या संचालक मंडळाला सुपूर्द करणे.
*       या सामाजिक कामांसाठी कंपनीने किती खर्च करावा याची शिफारस करणे.
*       वेळोवेळी कंपनीच्या Corporate Social Responsibility Policy ची पडताळणी करत राहणे. (जसे की तिच्यात काही बदल करणे आवश्यक असल्यास ते पाहणे)

संचालक मंडळाच्या जबाबदाऱ्या
*       CSR समितीने केलेल्या शिफारसी लक्षात घेऊन कंपनीची Corporate Social Responsibility Policy मंजूर करणे आणि त्यातील बाबी (म्हणजे काय करणार, काय नाही, ते) कंपनीच्या अहवालात, तसेच कंपनीच्या वेबसाईटवर (अर्थात वेबसाईट असल्यास) जाहीर करणे.
*       या CSR policy मध्ये मंजूर केलेली सामाजिक कामे होत आहेत याची खात्री करणे.
*       कंपनीच्या वार्षिक सरासरी निव्वळ नफ्यातील (Average net profit) किमान दोन टक्के रक्कम त्याच आर्थिक वर्षात, किंवा त्यानंतर लागून येणाऱ्या तीन वर्षांत CSR policy मध्ये ठरल्याप्रमाणे खर्च होत आहे याची खात्री करून घेणे.
*       असे करताना कंपनी ज्या भागात काम करत आहे त्या भागातील गरजांना विशेष प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणे.
*       ही रक्कम खर्च करण्यास कंपनी अपयशी ठरल्यास तसे होण्याची कारणे त्यांच्या संचालक मंडळाच्या अहवालात नमूद करणे.

Schedule VII बद्दल
सामाजिक कामांसाठी खर्च म्हणजे नक्की कोणत्या प्रकारच्या कामांसाठी खर्च याची यादी शेड्युल सातमध्ये दिलेली आहे. १ एप्रिल २०१४ पासून लागू झालेल्या या शेड्युलमध्ये एकूण ११ विषयांचा समावेश आहे.
1.      भूक, गरिबी, आणि कुपोषणाचा नायनाट
2.      शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगाराभिमुख शिक्षण यांचा मुले, महिला, वयस्कर आणि अपंग यांमध्ये प्रसार
3.      स्त्रियांच्या हक्कांसाठी, सक्षमीकरणासाठी काम
4.      पर्यावरणाशी निगडीत कामे (जसे की प्राणी, पक्षी, वनस्पती आणि जीवसृष्टीचे रक्षण आणि संवर्धन)
5.      राष्ट्रीय वारसा असेल्या जागा, कला, हस्तकला, संस्कृतीचे रक्षण व संवर्धन
6.      सैन्य दलातील पिडीत सैनिक, मृत सैनिकांच्या विधवा, आणि इतर अवलंबून कुटुंबियांसाठी काम
7.      ग्रामीण खेळ, तसेच Olympic, Para Olympic खेळांसाठीचे प्रशिक्षण
8.      मागास, भटक्या विमुक्त जमाती, अल्पसंख्यांक आणि महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या निधी संकलनास, किंवा Prime Minister’s National Relief Fund साठी आर्थिक मदत
9.      शैक्षणिक संस्थांमधील तंत्रज्ञानाधारीत प्रयोग शाळांसाठी आर्थिक मदत
10.  ग्रामीण विकासाची कामे
11.  झोपडपट्टी विकासाची कामे
जरी CSR अंतर्गत केलेली कामे वरीलपैकी निकषांवर आधारित असणे बंधनकारक असले तरी हे काम नक्की कसे करायचे, त्याची व्याप्ती काय असावी हे कंपन्या ठरवू शकतील, जेणेकरून ही कामे अधिक परिणामकारक पद्धतीने करता येतील.

आता समजावून घ्यायचा शेवटचा (महत्वाचा) भाग म्हणजे सेक्शन १३५ अंतर्गत दिलेल्या कायद्यासंदर्भातील नियम. हे नियम देखील १ एप्रिल २०१४ पासून लागू झाले. या नियमांत कायद्यात वापरलेल्या विविध शब्दांच्या व्याख्या, तसेच CSR Policy, CSR activities, CSR Committee, CSR Expenditure, CSR Reporting, अशा महत्वाच्या गोष्टींचे विस्तृत स्पष्टीकरण दिलेले आहे. जसे की CSR activities मध्ये कुठल्या activities मंजूर होतात आणि कुठल्या नाही (उदा. कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी केलेली कामे, वा मॅरेथॉन मध्ये सहभाग अशा गोष्टी) हे या नियमावलीत स्पष्ट केलेलं आहे.

तर या लेखात आपण CSR बद्दल कायदा काय म्हणतो हे पाहिले. पण तो अमलात येत असताना काय होते, कंपन्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, सामाजिक संस्था याकडे कसे पाहतात, सामाजिक कामांचे आयाम यामुळे कसे बदलत जातील, अशा मर्त्य गोष्टींबद्दल पुन्हा केंव्हातरी पाहता येईल.
त्यासाठी तुम्हाला हा लेख कसा वाटला? CSR act कळायला मदत झाली का? तुम्हाला तो वाचताना काय प्रश्न पडले? हे मला सांगाल. जेणेकरून त्यानुसार मी पुढचा लेख कसा असावा हे नक्की करू शकेन.

तर आहे हे असं आहे!
पूर्वार्ध (म्हणूयात का?)

केदार आडकर, निर्माण ५