'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 5 September 2017

अनुभव पावसाळी अधिवेशनाचा

या वर्षीचे पावसाळी अधिवेशन २४ जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान मुंबई येथे पार पडले. या अधिवेशनात आपला मित्र दिपक चटप (निर्माण ७) याने केलेला राज्यातील वेगवेगळ्या समस्यावरील संशोधनात्मक अभ्यास आमदार जयंत पाटील यांच्यामार्फत विधिमंडळात मांडला गेला. त्यासंदर्भातील महत्वाचे प्रश्न थेट संबंधित मंत्र्यांना विचारले गेले. तर जाणून घेवूया, दिपकच्याच शब्दात, त्याचा विधीमंडळातील पावसाळी अधिवेशनाचा अनुभव...

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्रात घडलेल्या ठळक घटनांकडे नियमित वृत्तपत्र वाचनातून माझे लक्ष होते. या घटनांवर राज्यातील विधानसभेत चर्चा व्हावी असे मला वाटत होते. तेव्हा मला वाटलेल्या अत्यंत महत्वाच्या १० ठळक घटनांची यादी केली. ती यादी अधिवेशन सुरु होण्याअगोदर आमदार जयंत पाटील यांना दाखवली. त्यातील ६ घटनांवर राज्याच्या विधिमंडळात चर्चा होऊ शकते. तेव्हा यावर विस्तृत अभ्यास करून नेमकी माहिती आणि व्यवहार्य मागण्यांचा अभ्यास करण्याची सूचना त्यांनी मला दिली. हे आवाहन मी पेलू शकेल काय? ही भीती मनात होतीच पण कृतीतूनच मार्ग मिळतो तेव्हा ‘कर के देखो’ या तत्वाची आठवण झाली.
त्यामुळे  भायखळा तुरुंगातील मंजुळा शेटे प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, मुंबई विद्यापिठाचा भोंगळ कारभार, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, राज्यातील महानगरपालिकांचे प्रश्न, राज्यातील वाढत्या झोपडपट्ट्या इत्यादी विषयांवर अभ्यास करण्याची संधी मला मिळाली.
 विधिमंडळाचं कामकाज प्रत्यक्ष बघताना मला जाणवले की आपण TV, वृत्तपत्रांत जे बघतो त्यातून सत्ताधारी आणि विरोधक हे दोन टोक वाटू लागतात. यांची सतत एकमेकांवर कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप चालू असतात असं दिसतं. परंतु सभागृहातील चित्र मात्र वेगळंच होतं. अत्यंत खेळीमेळीने, मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा होत होती. समस्यांवर उपाययोजना चर्चिल्या जात होत्या. काही ठोस पावलं उचलण्यासाठी आदेशही दिले जात होते. सहसा गोंधळामुळे कामकाज कमी होते परंतु यावेळी २-३ अपवाद वगळता कामकाज जास्त झालं.
विधिमंडळातील महिलांचं प्रतिनिधित्व नाममात्र वाटलं. महिला आमदार फारश्या बोलत नाही, चर्चेत नाममात्र सहभागी होतात असे दिसले. यशोमती ठाकूर, पंकजा मुंडे, नीलम गोऱ्हे, वर्षा गायकवाड, चित्रा वाघ यांसारख्या फार कमी महिला चर्चेत सहभागी होतात. केवळ महिलांचं सांख्यिक प्रमाण वाढवून चालणार नाही तर त्याचबरोबर त्यांचा विधिमंडळ कामकाजातील सहभागसुद्धा वाढविला पाहिजे असे मला जाणवले.
पावसाळी अधिवेशनातील कामकाज बघितल्यानंतर मला असे जाणवले की विधिमंडळ सदस्य विधीमंडळात विविध समस्यांवर चर्चा करू शकतात, त्यावर उपाययोजना शोधू शकतात कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन काटेकोरपणे केलेच पाहिजे पण त्याच बरोबर आपण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे की कोणीच ‘सदा सर्वकाळ सर्वज्ञानी’ नसतो किंवा जनतेचे प्रतिनिधी म्हणून एकदा निवडून दिल्यानंतर ५ वर्ष जनसामान्यांचे सर्वच प्रश्न सोडविण्याचे कर्तव्य जनप्रतिनिधींचेच असते असे नाही. त्याला नागरिकांनीही हातभार लावायला हवा. नागरिक म्हणून आपली भूमिका नागरिकांनीसुद्धा पार पाडायला हवी.
नागरिकांनी हातभार लावायला पाहिजे म्हणजे काय? तर, दैनंदिन जीवनात नागरिक म्हणून आपण विविध समस्यांना सामोरे जात असतो. उदाहरणार्थ, महिलांना सार्वजनिक ठिकाणी प्रसाधनगृह नसणे, रस्ता नसणे किंवा असला तर त्यात खड्डे असणे, शेतकरी असाल तर पीकविमा किंवा अन्य योजनांचा वेळेवर लाभ न मिळणे, कामगार असाल तर कमी भत्ता मिळणे किंवा अधिक वेळ काम करायला लागणे, युवक असाल तर स्थानिक असूनही स्थानिक कारखान्यांत रोजगार न मिळणे अशा विविध समस्यांना नागरिक  सामोरे जात असतात तेव्हा अशा समस्यांचा तटस्थ अभ्यास करून त्याची सांख्यिक माहिती काढणे, त्याचे स्वरूप जाणून घेणे, त्या समस्येचा पाठपुरावा करणे आणि मग ही संपूर्ण माहिती नेमक्या शब्दात आपल्या जनप्रतिनिधीपर्यंत पोहचवणे अशा वेगवेगळ्या पातळींवर नागरिक म्हणून जी कुठली कृती करू शकतो, ती कृती करणे म्हणजे नागरिक म्हणून हातभार लावणे होय. अशी कृती आपण सातत्याने केली पाहिजे असं मला वाटले.
निर्माणी वेगवेगळ्या समस्यांवर प्रत्यक्ष काम करत असतात तेव्हा हे काम करत असताना समस्यांच्या निराकरणासाठी काही उपाययोजना शासनाला सुचवायच्या असतील तर उपाययोजना सुचविताना त्यासोबत समस्येचे स्वरूप, संशोधनात्मक माहिती यांची जोड असली तर अधिक प्रभावी मागणी समोर येते असे मला वाटते.


     दीपक चटप, निर्माण ७            
                                                                                                            deepakchatap27@gmail.com

गडचिरोलीचे ‘परिवर्तन दूत’

संकेत आहेर आणि गजानन अंभोरे (दोघेही निर्माण ७) गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुक्यामध्ये असलेल्या आंबटपल्ली आणि कोठारी ह्या दोन ग्राम पंचायतमध्ये मुख्यमंत्री ग्राम विकास फेलो म्हणून काम करत आहेत. SocialCops मध्ये काम करणारी निर्माण ७ ची आपली मैत्रीण पूजा वेरुळकर ही नुकतीच त्यांच्या गावाला भेट देऊन आली. तिथे तिला काय दिसलं, ते तिच्याच शब्दात...

मी SocialCops नावाच्या कंपनीत काम करते. ही कंपनी डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या संस्थाना IT सपोर्ट पुरवण्याचं काम करते. आमच्या टीमने बनवलेला डॅशबोर्ड ग्राम विकास योजना बनवण्यासाठी ह्या फेलोजना किती उपयोगी आहे हे बघण्यासाठी मी ह्या दोन ग्राम पंचायतींना भेट देण्याचे ठरवले. संकेत आणि गजानन ह्या दोघांची गावे लगतच, पण दोन्ही गावी बस जात नाही. चंद्रपूरपासून २ तासाचा प्रवास करून नुकत्याच रोवलेल्या धानाच्या सुंदर शेतांमधून आणि मग गडचिरोलीच्या दाट जंगलामधून मी आणि संकेत त्याच्या गावी जाऊन पोहोचलो.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ह्यांच्या Village Social Transformation Mission अंतर्गत २०२० पर्यंत १००० गावांना आदर्श गाव बनवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विविध CSR आणि Foundations च्या मदतीने हे टार्गेट पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी ह्यावर्षी जवळपास २०० मुख्यमंत्री फेलोजची निवड करण्यात आली. हे फेलोज गावात राहून त्या गावाला आदर्श गाव बनवण्यासाठी काम करणार आहेत. Root level ला काम करण्याची ही उत्तम संधी असल्याने बऱ्याच निर्माणींनी ही फेलोशिप जॉईन केली आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध गावांमध्ये राहून त्या गावाच्या विकासासाठी ते काम करत आहेत. २-३ आठवड्याच्या यशदाच्या प्रशिक्षणानंतर ते गावात राहायला गेले.
गावाच्या ग्राम पंचायतची इमारत सुंदर होती. बसायला महागड्या खुर्च्या होत्या. बाहेर ग्रामसेविकेची कार उभी होती. मी कल्पना केलेल्या गडचिरोलीच्या आदिवासी गावातील ग्रामपंचायतसारखी ही मुळीच नव्हती. सरपंच आणि ग्रामसेविकेशी संकेतने ओळख करून दिली. गाव PESA अंतर्गत येत असल्याने सरपंच आदिवासी होत्या. आतापर्यंत मी पाहिलेले सरपंच म्हणजे स्वतःला गावाचे राजे समजणारे. पण ह्या सरपंच म्हणजे एका साधारण आदिवासी बाईसारख्या. त्यांच्याशी बोलताना एकूणच त्यांचे अज्ञान आणि गावाच्या विकासाबद्दल उदासीनता दिसून आली. ग्रामसेविकांचा पैशाचा घोटाळा उघडकीस आल्याने तिचेही कामास काही सहकार्य दिसत नव्हते. उदासीन सरपंच, भ्रष्ट ग्रामसेविका ह्या सगळ्यांसोबत काम करणे मला खूप आव्हानात्मक वाटलं आणि हे सगळं सांभाळून गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या संकेतचं कौतुक वाटलं. त्याचं राहायचं ठिकाणही खूप साधारण. एक छोटीशी खाट आणि थोडं सामान एवढंच काय ते फर्निचर. गावातील बहुतेक घर कच्चीच होती. घरांमध्ये टॉयलेट असणं तर दूरच. विकास कामांवर खर्च करण्यापेक्षा वेशीवर कमान बनविणे किंवा महागड्या खुर्च्या घेण्यात खर्च झालेला दिसत होता.  
संकेत म्हणाला, “मी काम करत असलेल्या ग्रा. पं. आंबटपल्लीचा आराखडा गडचिरोली जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट ग्राम विकास आराखडा म्हणून निवडला गेला.  हा आराखडा महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनच्या (व्हीएसटीएफ) गव्हर्निंग कौन्सिलच्या तिसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि इतर CSR हेड यांना सादर करायचा होता. शेवटी सादरीकरणाच्या आधारावर सर्व जिल्ह्यातून ज्याला चांगले मार्क्स मिळतील त्या ग्रामपंचायतीला ५ लाखाच बक्षीस होतं. मला चांगलं सादरीकरण न करता आल्यामुळे बक्षीस यवतमाळ जिल्ह्यातील ग्रा. पं. ला भेटलं. यासर्व प्रक्रियेतून जाताना, एका गोष्टीचे वाईट वाटलं की, माझ्यात उत्कृष्ट सादरीकरणाचे कौशल्य नसल्याने माझ्या गावातील लोकांसाठी ५ लाख रुपयांचे बक्षिस घेऊन येता नाही आलं. आणि सर्वात महत्त्वाची शिकवण भेटली कि, चांगलं काम करता-करता ते मला चांगल्या पद्धतीने मांडतासुद्धा यायला हवे.”
तिथून पुढे आम्ही दाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने भर पावसात गजाननाच्या गावी गेलो. तो त्याच्या क्वार्टरवर घेऊन गेला. तिथे मोबाइलला नेटवर्क नाही. त्यामुळे यूट्यूब, फेसबुकसारखी करमणूक तर नाहीच. एक साधा रेडिओ ठेवलेला होता कोपऱ्यात. त्यावर छान जुनी गाणी लावून गजाननने आमच्यासाठी खास बिनदुधाचा चहा बनवला. एक दिवस इंटरनेटशिवाय न राहू शकणाऱ्या मला, ‘अशा जंगलातील गावात राहण्याचा गजाननला  कंटाळा येत नसेल का?’ असा प्रश्न पडला. मग गजानन त्याच्या कामाबद्दल सांगत होता.
प्रत्येकाच्या ग्राम पंचायतमध्ये ३-४ गाव. रोज वेगळ्या गावांना भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर आवश्यक कृती करणे हे त्यांचं रोजच काम. गावाच्या विकासासाठी बऱ्याच योजना असल्या तरी त्याच्या अंमलबजावणीमध्ये खूप त्रुटी आहेत. गावात गरजूंपेक्षा ग्राम पंचायत सदस्यांच्या ओळखीच्या लोकांना जास्त लाभ मिळतात. हे टाळण्यासाठी आणि गरज आहे त्यांनाच लाभ मिळावा ह्यासाठी ह्या फेलोजनी सुरवातीचे २ महिने घरोघरी जाऊन सर्वे केला. त्यातून मिळवलेल्या डेटाच्या आधारे त्यांनी एक ग्राम विकास योजना बनवली आहे. बरेच फेलोज नवखे असल्यामुळे ग्राम विकास योजना कशी बनवतात ह्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यासाठी त्यांना फारसे ट्रैनिंग किंवा रिसोर्सेस मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच जवळपास एक महिना सर्वे डेटा analysis, गावकऱ्यांसोबत चर्चा आणि योजनांचा अभ्यास करून ही ग्राम विकास योजना बनवली आहे.  आता उर्वरित कालावधीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे केलेलं नियोजन implement करण्याचं काम आहे. 
खरंतर गडचिरोलीच्या जंगलातल्या दोन आदिवासी ग्राम पंचायतमध्ये त्यांना सोडून दिलंय आणि आता ह्यांचा विकास करा असं सांगितलं असं दिसत होतं. पण कसा करायचा ह्यासाठी ना काही सपोर्ट ना काही प्लॅन. तुम्ही ठरवा काय करायचं कसं करायचं. Rural Development, community interaction चे कितीही पेपर्स वाचले, अभ्यास केला आणि औपचारिक प्रशिक्षण घेतलं तरीही प्रत्यक्ष गावात काम करायला गेल्यावर त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. त्यामुळे गावात काम करताना ह्या फेलोजना बऱ्याच अडचणी येतात. राहायचं घर शोधण्यापासून उच्च अधिकाऱ्यांच्या राजकारणापर्यंत सगळंच.
अशा परिस्थितीमध्ये  काम करणं किती अवघड आहे हे त्यांना प्रत्यक्ष भेटून आल्यावरच कळतं. ‘Suffering में ही meaning  है’ हे फेलोज प्रत्यक्ष जगताना दिसतात. म्हणूनच बाहेर रिमझिम पावसाच्या आवाजात, रेडिओवरची जुनी गाणी ऐकत आणि काळा बिनदुधाचा चहा पीत आपल्या दोन निर्माणी मित्रांच्या कामाबद्दल ऐकताना मला अशा चेंज मेकर्सच्या कम्युनिटीचा भाग असल्याचा अभिमान वाटला!
                                                                                                                                                                                                                                                                         पूजा वेरुळकर, निर्माण ७
                                                                                                    poojaverulkar@gmail.com

पुस्तक परिचय-आज भी खरे हैं तालाब :अनुपम मिश्र

मध्य प्रदेश के करड़ी नामक गाँवमें मैं महिला बचत गट (SHG) के एक मिटिंगमें गया था। वहाँ एक ५५ - ६० साल के अम्मा के पैरों पर एक चित्र को गुंदा हुआ देखा। कुछ रेखाओं में बना यह चित्र 'सीता - बावड़ी' का था। अनुपम मिश्रजीद्वारा लिखित आज भी खरे हैं तालाब में सीता-बावड़ी या तालाब को शरीर पर गुंदने की प्रथा का वर्णन मिलता है। उन अम्मा के पैरोंपर गोंदा हुआ बावड़ी का चित्र बताता है कि तालाबों को पुराने लोग कितना महत्व देतें थें।
हजाह के वज़ीर असाफजाह जब दक्षिण की ओर सेना लेकर निकले थे, तो सेना का सामान उठाने हेतू लाखा बंजारा को (जिस बंजारे के पास एक लाख गाय-बैल हो) साथ लिया गया था। इतनी बड़ी सेना, लाख से ज्यादा पशु और पशुओं की देखभाल करने वाले बंजारा लोग जहाँ रुकेंगे वहाँ उन्हें कितना पानी लगेगा यह आप सोच सकते हो। जहाँ भी पानी कम मिलता वहाँ यह बंजारा लोग अपना कर्तव्य समझकर तालाब बना देते। ऐसे ही एक लाखा बंजारे ने मध्य प्रदेश में सागर नामक एक विशाल तालाब बनाया और उस शहर का नाम ही सागर हो गया। दुखद बात है कि आज यह तालाब प्रदूषित हो गया है और छोटा हो राहा है। ऐसे कुछ ऐतिहासिक घटनाओं का वर्णन ‘आज भी खरे है तालाब’ में मिलता है।
तालाब बनाने वालों को राजा की तरफ से लगान माँफी भी मिलती। कुछ पंचायतों में किसी से सजा के रूप मे वसूली गई राशि को तालाबों के मरम्मत मे लगा दिया जाता। तो कही गड़ा हुआ कोष प्राप्त होने पर राजा तालाबों के निर्माण हेतू उस कोष का उपयोग करते थे। समाज को जीवन देने वाले तालाबों को लोग निर्जीव कैसे मान लेते? तालाबों के पास ‘थूकना मना है’, ‘जूते पहनकर आना मना है’ इस तरह के सूचना फलक लगाए बिना ही लोग आदरभाव से इन नियमों का पालन करते थें। जब भी अकाल आता तो समाज अपना कर्तव्य मानकर तालाब निर्माण मे लग जाता। कम बरसात वाले राजस्थान के इलाकों में भी पानी की समस्या नहीं थी। ‘उस शहर में तो २२६ तालाब हैं’ इस तरह बड़े शहर या अबादी नापने से तालाबों को जोड़ दिया जाता था। आज तालाब सूख चुके हैं क्योंकि तालाब बनाने वाली संस्कृति और परम्परा भी सूख चुकी है।
इस किताब के ‘निव से शिखर तक’ नामक पाठ में तालाबों की छोटी से लेकर बड़ी तांत्रिकी हिस्सों का भी अभ्यास पढ़ने को मिलता है। दक्षिण में तालाबों के साथ-साथ उप्पार और वादी मान्यम्, खुलगा मान्यम्, पाटू मान्यम्, उर्नी मान्यम्, कैरी मान्यम्, वयक्कल मान्यम् आदी जिम्मेदारीयाँ भी बनती। तालाब की टूट-फूट ठीक करना, मरम्मत करना, घरों तक पानी लाना, संयोजन, नहरों की देखभाल ऐसी जिम्मेदारीयों को आपस में बाँटा जाता था। मैं इसे आज के सहभागी सिंचाई प्रबंधन (Participatory Irrigation Management) के योजना से तुलना कर देख पा रहा हूँ। सहभागी सिंचाई प्रबंधन जैसी योजना में भी इन्ही तरह से समितियाँ बनाकर जिम्मेदारियों को बाँटा जाता है। किसी लिखित स्वरूप मे न होकर भी पहले सभी कामों को निभाया जाता था और आज लिखित स्वरूप मे (So called Guidelines) होने के बावजूद भी योजनाएँ असफल दिख रही है। नहर के आखरी किसान तक पानी कभी पहुँचता ही नही
एक जमाने में देल्ली में ३५० तालाब थें। आज यहाँ पर सभी को नल योजना से पानी मिलता है। इसी तरह बड़े शहर दूर गाँव में बने तालाबों का पानी ले रहे हैं या फिर भूजल का उपयोग होता है। पुराने जमाने में समाज और राजा मिलकर तालाबों का रखरखाव करते क्यूँकि तालाबों से समाज स्वामित्व की भावना से जुड़ा हुआ था। आज तालाबों को पी.डब्ल्यू.डी के हवाले कर इस स्वामित्व की भावना को खत्म कर दिया है। १९९० में मध्य प्रदेश के देवास शहर में सूखा पड़ गया। पानीके कामके बजाय १० दिन तक दिन-रात रेल्वे स्टेशन पर काम किया गया। फिर इंदौरसे रेल मार्गसे पानी लाया गया। तालाबों पर काम और उनका रखरखाव कर पाए तो रेलसे दूधके भावमें पानी लाने की जरूरत नहीं पड़ती। इस गलती की सजा तो २०१५ में लातूर को भी देखने को मिली है। सभी बड़े शहरों को पानी चाहिए पर पानी दे सकने वाले तालाब नहीं। पानी, तालाब, समाज का इतिहास उदाहरण के साथ इस कीताब में मिलता है।
इस कीताब के पहले पाठ का आखरी वाक्य है कि ‘क्योंकि लोग अच्छे-अच्छे काम करते जाते थें’। और आखरी पाठ का आखरी वाक्य कुछ इस तरह बन जाता है -
कुछ कानों में आज भी यह स्वर गूँजता है – ‘अच्छे-अच्छे काम करते जाना’।

                                                                                               प्रतिक उंबरकर, निर्माण ६
                                                                                             pratik.umbarkar8@gmail.com