'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 9 March 2013

सीमोल्लंघन, फेब्रुवारी २०१३


निर्माण 5 च्या शिबीरमालिकेत वैद्यकीय मित्र सामील

निर्माण 5 शिबीरमालिकेतील दुसर्‍या गटाचे पहिले शिबीर 2 ते 10 फेब्रुवारी, 2013 या दरम्यान यशस्वीरित्या पार पडले. या गटात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आरोग्य क्षेत्रात काम करु इच्छिणार्‍या 56 तरुण-तरुणींचा सहभाग होता.
निर्माणच्या प्रत्येक पहिल्या शिबिराप्रमाणे ‘तारुण्यभान ते समाजभान’ व ‘स्वत:ची ओळख’ या शिबिराच्या मध्यवर्ती संकल्पना होत्या. याशिवाय आरोग्ययंत्रणेत हितसंबंध असणाऱ्या विविध घटकांच्या दृष्टीने ‘सर्वांत चांगला डॉक्टर कोण?’ या छोट्या स्वाध्यायाची आखणी करण्यात आली होती. विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलांनी सादरीकरण केले व संपूर्ण आरोग्ययंत्रणेचं चित्र उभे राहिले. यादरम्यान डॉ.अभय बंग (नायना), डॉ. योगेश काळकोंडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
Nero’s Guest या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित लघुपटाने शिबिरार्थ्यांना हलवून सोडले. त्याचा परिणाम होऊन शेतकर्‍यांच्या संवेदना जाणण्यासाठी सर्वांनी एक वेळेचा उपवास केला. या वेळेचा सदुपयोग करून स्वतःच्या जीवनशैलीत बदल करण्याचे संकल्प अनेकांनी केले, तसेच या प्रश्नाचा अभ्यास करून त्यावर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.  
निर्माणच्या शिबिरांतून समाजाप्रती जबाबदारी व त्या साठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. याची सुरुवात कशी करावी याचे उदहारण काही जणांच्या प्रवासातून समोर आले. त्यामध्ये डॉ. अभय बंग (नायना) यांच्या ‘सेवाग्राम ते शोधग्राम’ बरोबरच आनंद बंग, सुजय काकरमठ यांनी देखील आपला प्रवास सर्वांसमोर मांडला.
पुढील ६ महिन्यांत आपण प्रत्यक्ष काय करु शकतो- याचे सर्वांनी व्यक्तिगत व सामजिक पातळीवर नियोजन केले. शेवटी ‘हम होंगे कामयाब...’ गुणगुणत या शिबीराची समाप्ती व प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली.

गोपाल महाजन व अजय होले करताहेत रोजगार हमीच्या परिणामकारकतेचा अभ्यास


भारतात २००५ मध्ये रोजगार हमीचा कायदा झाला. तेव्हापासून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व त्याबरोबर नैसर्गिक संसाधनांची निर्मिती, संवर्धन व व्यवस्थापन या प्रमुख उद्देशांनी रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे सुरु आहेत. 'रोहयो द्वारा होणाऱ्या कामांची गुणवत्ता व उपयोग' असा अभ्यास नाशिकमधील ‘प्रगती अभियान’ या संस्थेच्या वतीने करण्यात आला. गोपाल महाजन आणि अजय होले यांनी हा अभ्यास केला. नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ तालुक्यातील एकूण ९ आदिवासी गावातील ४० कामांचे त्यांनी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण केले. यात रोहयोच्या कामांद्वारे तेथील लोकांच्या जीवनात झालेले बदल, उत्पन्न, स्थलांतराचे प्रमाण तसेच कामाची तांत्रिक गुणवत्ता, शेतीवरील परिणाम इ. चा समावेश होता. तसेच रोहयोचे गाव पातळीवरील नियोजन व अंमलबजावणी या दोन्ही प्रक्रियांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. हा अभ्यास व त्याच्या विश्लेषणातून मिळालेले निष्कर्ष खूपच महत्वपूर्ण आणि पुढील कामासाठी उपयोगी आहेत असा त्या दोघांचा अनुभव आहे.
‘प्रगती अभियान’बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.pragatiabhiyan.org/index.html

अटकेची पर्वा न करता, अल्पवयीन मुलीला न्याय मिळण्यासाठी धुळे गटाचा मोर्चा


२९ जानेवारीला नाशिकमधील एका १४ वर्षीय मुलीला धुळ्यातील कुंटणखान्यात डांबून ठेवल्याची घटना समोर आली. त्या अल्पवयीन मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी, धुळ्यातील निर्माणच्या गटाने प्रतिभा शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली २ फेब्रुवारी २०१३ रोजी मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी व एस.पीं.ना निवेदन सादर केले. ह्या प्रकरणी पोलिसांनी ४ लोकांना त्वरित अटक केली, मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी विजय ताटीया याचे वरपर्यंत लागेबांधे असल्यामुळे त्यांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते.
ह्यावर पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली. मात्र विरोधाला न जुमानता निर्माण गटाने ४ फेब्रुवारीला धरणे आंदोलन केले. ह्यावर प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी १४ लोकांना अटक केली. ह्यात निर्माणचे संदीप देवरे, पूजा वारुळे, माधुरी मगर, जागृती बोरसे ह्यांचा समावेश होता. ह्या सर्वांवर कलम १६८, १६९ खाली गुन्हा नोंदवून त्यांना दीड तासाने सोडण्यात आले.
अटकेने घाबरून न जाता या गटाने प्रतिभा शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानभवनात नीलम गोऱ्हेंची भेट घेतली व श्री. आर. आर. पाटील ह्यांना निवेदन सादर केले. यानंतर काही दिवसांतच धुळे पोलिसांनी २ आरोपींना अटक केली व फरारी विजय ताटीयावर १०,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. तसेच धुळ्यातील महिला सुरक्षेबद्दल एक समिती स्थापन करून त्यात निर्माण सदस्यांचाही समावेश करण्याचे आश्वासन धुळे पोलिसांनी दिले. बलात्कार झालेल्या मुलीचा जबाब पोलिसांनी कलम १६४ अंतर्गत न्यायाधीशांसमोर लिहून घेतला.
त्या अल्पवयीन मुलीच्या पुनर्वसनाचे काम सध्या निर्माण गट पुढे नेत असून त्यासाठी जिल्हाधिकारी व  महिला बालकल्याण विभागाशी चर्चा सुरु आहे. 

झारखंडच्या बालमृत्यूदरावर नजर ठेवण्यासाठी अतुल-अश्विनचे सॉफ्टवेअर


Home Based Newborn Care (HBNC)’ या सर्चच्या कार्यक्रमामार्फत बालमृत्यूदरातील नवजात बाळाचा टक्का व एकूणच बालमृत्यूदर वेगाने कमी झाला आहे. या कार्यक्रमाला मान्यता मिळाली असून वेगवेगळ्या ठिकाणी बालमृत्यू कमी करण्यासाठी त्याची अंमलबजावणी सुरू आहे. झारखंडमध्ये या सराईकेला भागातील १७४ गावांत हा कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी झारखंड सरकार, Tata Steel Rural Development SocietyAmerica India Foundation यांनी घेतली आहे. झारखंडमधील गावागावांत आरोग्यदूतांनी जमा केलेली बाळांविषयी माहिती कॉम्प्युटरमध्ये फीड करणे (data entry) व या माहितीच्या आधारे आवश्यक ते मासिक अहवाल तयार करणे यासाठी सर्चचे इंजिनियर्स निर्माण ३ चे अश्विन भोंडवे व अतुल गायकवाड यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून झारखंडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एका क्लिकवर ठराविक भागात व ठराविक काळात जन्मलेल्या बाळांपैकी किती बाळे मरण पावली, किती अपुऱ्या महिन्याची/कुपोषित आहेत व किती बाळांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे वेळच्यावेळी कळू शकणार आहे. तसेच त्यांना गावपातळीवरील सर्व आरोग्यदूत व त्यांच्या कामाचे पर्यवेक्षण करणारे पर्यवेक्षक यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे व कार्यक्रम सुरळीत चालू आहे का यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
या सॉफ्टवेअरचा user interface विकसित करण्यासाठी अतुल व अश्विनने गडचिरोलीच्या स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले होते. या सॉफ्टवेअरसाठी अतुल-अश्विनला सर्चच्या संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. महेश देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

लोकसहभागातून कामाविषयी डॉ. सुजय काकरमठचे ज्युनिअर्सना मार्गदर्शन


निर्माण ४ चा सुजय काकरमठ गेले ९ महिने सर्च येथे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गडचिरोलीच्या ४४ आदिवासी गावांना आरोग्यसेवा देत आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने MBBSची पदवी घेतली असून त्याच्या महाविद्यालयाने नुकतेच आयोजित केलेल्या ‘TRINITY’ परिषदेत त्याने एका परिसंवादात भाग घेतला. ‘वैद्यकीय शिक्षणाचा प्रत्यक्षात काम करताना किती उपयोग होतो?’ याविषयी मांडणी करण्यासाठी वेगवेगळया भूमिकांमध्ये कार्यरत व्यक्तींना परिसंवादात निमंत्रित केले गेले होते. त्यात नुकतेच वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर वैद्यकीय काम करणाऱ्या डॉक्टरची भूमिका सुजयने मांडली. याच परिषदेत डॉ. अभय बंग (नायना) यांना ‘Research with the people’ याविषयी बोलण्यासाठी निमंत्रित केले गेले होते. नायनांनी युवा डॉक्टरांना ‘Go where the problems are and not where you are a problem’ असा मंत्र दिला. सामाजिक योगदान देण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘निर्माण’ची तोंडओळख करून दिली व याच महाविद्यालयाचा सध्या आदिवासींना आरोग्यसेवा देत असलेला निर्माणी म्हणून सुजयला आपले अनुभव मांडण्याची संधी दिली. सुजयने वैद्यकीय शिक्षण व internship दरम्यान त्याला पडलेले प्रश्न, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्याची धडपड व आदिवासींना आरोग्यसेवा देताना आलेले अनुभव आपल्या भाषणातून मांडले. याच परिषदेच्या निमित्ताने नायना व सुजयने मुंबईतल्या निर्माणींसोबत संवाद साधला.
महाविद्यालयात बरेचदा प्रवाहाची दिशा आपली स्वप्ने ठरवत असतो. मात्र आव्हानात्मक, तरीही समाधान देणाऱ्या मार्गाचा प्रत्येकाला शोध असतो. महाविद्यालयात होणाऱ्या परिषदा, संमेलने ही अस्वस्थ तरुणाईसोबत संपर्क साधण्यासाठी उत्तम माध्यमे असल्याचे सुजयच्या अनुभवातून समजते.

स्मिता तोडकर व केदार आडकर ‘सर्च’मध्ये रुजू


निर्माण ४ची स्मिता तोडकर व निर्माण ५चा केदार आडकर ‘सर्च’मध्ये रुजू झाले आहेत. स्मिता ही शिक्षणाने आयुर्वेदिक डॉक्टर असून सर्चमध्ये ती बाह्यरुग्ण विभागातील रुग्णतपासणीसोबतच आंतररुग्ण विभागाचे व शस्त्रक्रिया शिबिरांचे व्यवस्थापन व परिचारिकांचे प्रशिक्षण इ. जबाबदाऱ्या सांभाळणार आहे. यापूर्वी तिने आंध्र प्रदेशमधील भैसा येथे आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्याचा अनुभव घेतला होता.
केदारने Hospital management मध्ये पदविका घेतली असून त्यानंतर Human Resources या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सर्चच्या प्रशासकीय विभागाला तो अतिथीगृहे, मेस व विविध प्रशिक्षणांच्या व्यवस्थापनात मदत करेल. पहिल्या महिन्यात त्याने श्रमदानाच्या माध्यमातून सर्चमधील प्रक्रियांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केलेली आहे. याशिवाय सर्चमधील प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावता येईल यासाठी तो प्रयत्नशील आहे. 

शोधक पाउले


निर्माण शिक्षण प्रक्रियेचा एक भाग म्हणून विविध सामाजिक प्रश्न समजून घेणे व प्रश्न सोडविण्याच्या विविध पद्धतींचा, तत्त्वज्ञानांचा अभ्यास करणे हे ओघाने आलेच. असेच काही प्रयत्न आपल्या काही मित्र मैत्रिणींनी गेला एक महिनाभर केलेत. त्याची ही थोडक्यात माहिती.

·     ·     निर्माण ५ च्या मेनका रामचंदानीची अक्षरनंदन शाळेला भेट
 

पुण्यातील अक्षरनंदन ही शिक्षणक्षेत्रातील एक प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते. औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मेनकाने तेथील कार्यपद्धती व शैक्षणिक पद्धती समजून घेण्यासाठी नुकतेच अक्षरनंदनला भेट दिली
‘अक्षरनंदन’बद्दल अधिक माहितीसाठी: http://aksharnandanschool.org/


  
·     ·     निर्माण ५चा प्रफुल्ल वडमारे व निर्माण ४चा मयूर सरोदे यांची पाबळ विज्ञानआश्रमाला भेट
    
    कामातून शिक्षण व जीवनोपयोगी शिक्षण हे ध्येय मानून पाबळ येथील विज्ञान आश्रम हे खरंतर गांधीजींच्याच नयी तालीम शिक्षण पद्धतीचे एक प्रत्यक्ष उदाहरण. अर्ध्यातून शाळा सोडलेल्या मुला-मुलींसाठी ही संस्था उद्योजक बनण्याचा मार्ग उपलब्ध करून देते. Agriculture, Food Technology, Mechanical Workshop आणि Electrical Workshop इ. विषयांमध्ये या मुलामुलींना प्रशिक्षण दिले जाते. विज्ञान आश्रमाला नुकतेच निर्माण ५चा प्रफुल्ल वडमारे व निर्माण ४चा मयूर सरोदे यांनी भेट दिली. प्रफुल्ल हा मुळचा कॉम्प्युटर इंजिनिअर असून मयूर सध्या सौरउर्जेवर काम करत आहे.
    ‘विज्ञानआश्रमा’बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.vigyanashram.com/

·     ·     निर्माण ५चे प्रफुल्ल वडमारे व कल्याणी वानखेडेची व सोनदरा गुरुकुलम् ला भेट


प्रफुल्ल व आर्किटेक्ट असलेल्या कल्याणी वानखेडे ह्यांनी बीड मधील डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम् ला भेट दिली. आनंदी शिक्षण ह्या ध्येयाने सुरु केलेली ही एक निवासी शाळा आहे.
‘सोनदरा गुरुकुलम्’बद्दल अधिक माहितीसाठी: http://sondaragurukulam.org/


·     ·     निर्माण ५च्या युवांची श्री. आनंद कपूर व कुसुमताई कर्णिक ह्यांच्या शाश्वत संस्थेला भेट 


श्रद्धा चोरगी, श्रीजित कुलकर्णी, वेदवती लेले यांच्यासह निर्माण ५च्या युवांनी मंचर येथील ‘शाश्वत’ संस्थेला भेट दिली. शाश्वत संस्थेचे आनंद कपूर हे आय.आय.टी. मधील सिव्हील इंजिनिअर असून गेली अनेक वर्ष ते डिंबे धरणामुळे निर्वासित झालेल्या लोकांच्या प्रश्नावर कार्यरत आहे. निर्वासित लोकांच्या रोजगाराच्या, शिक्षणाच्या, जमिनीच्या अशा सर्व आघाड्यांवर शाश्वत ही संस्था काम करीत आहे. अधिक माहिती साठी खालील संकेतस्थळ बघा -


·     ·     पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या कचरा डेपोला भेट – एक उत्साहवर्धक अनुभव   
कचऱ्याचा प्रश्न समजून घेण्याच्या हेतूने मूळच्या इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर असलेल्या मृण्मयीने नुकतेच पी.सी.एम.सी. च्या कचरा डेपो ला भेट दिली. मात्र तेथे तिला अपेक्षेपेक्षा वेगळे व उत्साहवर्धक चित्र पहायला मिळाले. कचऱ्याला वास येऊ नये म्हणून फवारणी केली होती. आजूबाजूचा परिसर अस्वच्छ वाटू नये म्हणून तेथे एक छोटेखानी बाग बनवली आहे. कचऱ्याचे व्यवस्थित segregation होत असून ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासाठी नेटका व स्वयंचलित प्लांट उभारण्यात आला आहे. तसेच खत विकण्यासाठी एका कंपनीशी करार देखील केला गेला आहे. 

                                               
·     ·     निर्माण ५च्या सतीश सोनावणेची ‘आरती’ला भेट


जैविक कचऱ्यावर संशोधन करणाऱ्या डॉ. आनंद कर्वे यांच्या ‘आरती’ या संस्थेला निर्माण ५च्या सतीश सोनावणेने भेट दिली. घरच्या घरी Biogasची कशी निर्मिती होऊ शकते, पालापाचोळ्यापासून charcoal (ज्याची calorific value खाणीतून मिळण्याऱ्या कोळशापेक्षाही जास्त असते) कसा बनवता येऊ शकतो  अशा पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाविषयी ऐकण्याची व पाहण्याची त्याला संधी मिळाली.
‘आरती’ बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.arti-india.org/

Friday 8 March 2013

Notes from internship



The relatives agreed to his price. I had no idea from where the money was going to come. I started feeling ashamed, angry and more restless than ever before. How many people have we pushed into poverty for satisfying our greed? Am I a doctor, a commission agent or a sophisticated extortionist? 

 Internship was the year when we started ‘dealing’ with patients - and literally so. As an intern, part of my job was handing over prescriptions to relatives. Once when I was working in the Obstetrics & Gynecology (OBGY) ward, I handed over a prescription to an old lady who had come there to get her daughter delivered.  She touched my feet with her hands and pleaded me to not prescribe any more. The next day, I tried to wonder what her state of mind was when she did that. ‘People’ had always been telling me I was in a noble profession. I was in a profession which most people think is synonymous with intelligence. She obviously did not touch my feet out of respect or gratitude. She had very little money, no relatives to help her out. She had come to a government hospital exactly because of these reasons. The prescriptions were expensive. She was absolutely helpless. How could I be intelligent if an old lady had to touch my feet to get the point across? How could I be noble if she had to give away her self-respect to get her daughter treated?
Earlier this year, I went to the pediatric ward for some work. There was a man whose son was admitted to the ward the day before. He was an Adivasi and had come from a hilly area about 100 km away from the hospital. He had travelled by train and carried his ~8 year old child on his arm all the way to the hospital. He asked me if I could arrange for a plate for him. On probing, he said he had not eaten since the morning of the previous day because he did not have a plate while all other patients did. (The ward always has extra plates and all he had to do was ask). He had used the money he had to buy the medicines prescribed for his son. (And hence he had not been able to buy something to eat either). He preferred staying hungry for two days to requesting a plate. After 2-3 days, his child was to be transferred to a different hospital and my job was to accompany him. I completed the formalities at the other hospital and went to meet him for the last time. He started crying profusely and said ’Please let us go from here. You will kill us both anyway. We prefer dying in our village’. He had come to a hospital hoping that his son gets better, but now was sure that both will be killed.
When I was posted in a PHC, there was a patient for delivery who had to be referred for Caesarean section. It was late at night. The PHC ambulance was not available. They were vegetable vendors by occupation and did not have money to transport the patient to the next referral centre. Private transport, especially at night, was expensive. The relatives were obviously angry. They arranged for a tempo from their village and I accompanied them with a nurse. The referral centre was approximately 20 km away. The doctor there said that he was only an MBBS bonded candidate and there was no consultant available. The next higher referral centre was 50 km away and the patient’s condition had worsened. Going to the next government centre was very risky because of the distance. The relatives decided to get the baby delivered at a private hospital. The first 3 private doctors did not bother to come and see the patient at that hour. The fourth one was a non-MBBS general physician with a 20 bedded hospital. He quoted Rs. 27,000 for the surgery. The relatives discussed amongst themselves, made a few phone calls and told him that someone from their village had been delivered there for Rs. 18,000. He said-‘I am willing to take risk at this hour. The extra fee is for that’. The relatives agreed to his price.  I had no idea from where the money was going to come. I started feeling ashamed, angry and more restless than ever before. How many people have we pushed into poverty for satisfying our greed? Am I a doctor, a commission agent or a sophisticated extortionist? 
Whose responsibility is it to fix this? Doctors believe that their responsibility is limited to diagnosing and treating. But what do we treat? We treat the case paper. We treat the investigation report. Everything else is not my headache. I am a doctor. Everything else is inferior. Isn’t higher education supposed to add one more skill to what I already have? Is it supposed to be the only skill?  I am ALSO a doctor. If education does not empower me, there is a serious problem with my educational system
I realized I cannot help anybody by simply prescribing medicines. I had to go beyond that. At this point I did not know what to do next. I wanted to do something, but I had no clarity as to exactly what. I had several questions.  How can I bring about a change? Is there a method, a science to it? What skills do I need? Will I be alone? How will I raise funds for my work? What about my survival? What about my responsibilities towards my family?
I had heard Nayana speak about HBNC at JJ Hospital once before and hence I had heard about SEARCH and its work. I decided to visit Gadchiroli and meet Nayna to discuss my dilemma with him. Through him I was introduced to NIRMAN, and an enriching journey of serving 44 Adivasi villages in Gadchiroli, through the Mobile Medical Unit, began.


Sujay Kakarmath

तिनका तिनका जर्रा जर्रा


दोन आकाराने छोट्या कविता पाहा.

१)  गाणे
     ---
     छानसे घरकुल नांदते गुलमोहोराखाली
     केवळ कांकणे किणकिणली असती.
     रोजच आला असता चंद्र खिडकीत
     नक्षत्रांपलिकडली एक दुनिया असती.

     भरल्या पोटी अगा पाहातो जर चंद्र
     आम्हीही कुणाची याद केली असती.


२)  बेतून दिलेलं आयुष्य -----

     बेतून दिलेलं आयुष्य; जन्मलो तेव्हा-
     प्रकाशही तसाच बेतलेला
     बेतालेलेच बोलणे बोललो. कुरकुरत
     बेतलेल्याच रस्त्याने चाललो; परतलो
     बेतल्या खोलीत; बेतलेलेच जगलो
     म्हणतात! बेतलेल्याच रस्त्याने गेलात तर
     स्वर्ग मिळेल. बेतलेल्याच चार खांबात
     थूः

दोन्ही कविता नारायण सुर्वे यांच्या आहेत, "माझे विद्यापीठ" या संग्रहातल्या

एक प्रश्न उपस्थित करतो, निर्माणी मित्रमैत्रिणींसाठी. कवितांमधून भावना छान व्यक्त करता येतात. आणि भावना या पुढे जाऊन कृतींमागचे "इंजिन" ठरतात. पण या इंजिनाने चालणाऱ्या गाडीचे नियंत्रण मात्र भावनांनी करता येत नाही. त्यासाठी विचार, विवेक वगैरे लागतात. तेव्हा विचार-विवेक व्यक्त करणाऱ्या कविता तरी हव्यात
किंवा
या टप्प्यावर कवितांचे आभार मानून इतर कोणत्यातरी साहित्यप्रकाराची मदत घेऊन पुढे जावे लागते. 
आता कविता आणि हा पुढचा साहित्यप्रकार यांच्यात 'लहान-मोठे' ठरवता येईल का?
                                      नंदा

पुस्तक परिचय


एका नक्षलवाद्याचा जन्म- विलास मनोहर

मी वाचलेल्या पुस्तकांपैकी हे एक अतिउत्तम दर्जाचं लिखाण केलेलं पुस्तक आहे. ही एक उत्तम कलाकृती तर आहेच पण त्या शिवाय ते वास्तवदेखील आहे. पुस्तकाच्या सुरुवातीसच लेखक हे स्पष्ट करतो की यातील घटना खऱ्या घडल्या आहेत. नावे बदलली आहेत.
इतक्या उत्तम पुस्तकाची माहिती द्यायला कुठून सुरुवात करावी हा एक प्रश्न आहे. त्याबद्दल माझ्या डोक्यात गोंधळ आहे. आणि हे पुस्तक आपल्या डोक्यातले अनेक गोंधळ तीव्र करत. माझ्यासारख्या शिकलेल्या आणि चार बुकं वाचलेल्या व्यक्तीच्या डोक्यातही  नक्षलवादाबद्दल गोंधळ आहेत. नीट माहिती नाही हे मी मान्य करायला हवं आणि मग आपण विचार करू शकतो की आदिवासी लोकांच्या मनात याबद्दल काय गोंधळ उडत असेल? हा गोंधळ कायम असताना लिहिलेला हा लेख आहे.
एका नक्षलवाद्याचा जन्मया शीर्षकातच खूप अर्थ सामावला आहे. नक्षलवाद्याचा जन्म का होतो? कसा होतो? त्याला कोण कोण जबाबदार असतं? या प्रश्नाची उत्तरे यात मिळतात, किंवा साहजिकच आपणच उत्तरे शोधायला लागतो.
नक्षलवादी हा कुणी आकाशातून टपकलेला प्राणी नसतो. तो पण आपल्यासारखा माणूसच असतो. पण मग तो अशी पावले का उचलतो? कुठल्याही गोष्टीचा जन्म/निर्मिती होण्यासाठी बऱ्याच घटना आणि  prerequisites ची गरज असते. या सर्व prerequisitesचा अभ्यास आपल्याला यात बघायला मिळतो.
एका सत्य घटनेबरोबरच ही एक कादंबरी देखील आहे. मला साहित्यातील फार काही कळत नाही पण जेवढे कळते त्यावरून याचे साहित्यिक मूल्यही खूप उच्च दर्जाचे आहे असे वाटते. हे पुस्तक एखाद्या report प्रमाणेही आहे. तसेच लिहिल्या गेलेल्या काळाचे ते documentation देखील आहे. (दुर्दैवाने ते आजही लागू पडत आहे असे वाटते). हे पुस्तक एक चिंतनही आहे. या आणि अश्या प्रकारच्या समस्या कश्या सोडवाव्यात या विचारांची बीजे आपल्याला या पुस्तकात सापडतात. नक्षलवादाची समस्या सोडवण्यासाठी त्याचा जन्म समजावून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी (मुख्यतः पोलीस) जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे. हे असं होतं मग त्यानंतर असं होतं आणि मग हे असं होतं अशी गणितीय समीकरणाप्रमाणे यातील arguments ची मांडणी आहे. गोष्टी कश्या घडत जातात याबद्दल बर्णन आहे. यात गोष्टी एका मागोमाग एक आधीच्या गोष्टींच्या आधाराने घडत जातात.
लेखकाची लेखनशैली अप्रतिम आहे. लेखक कोणाचीच बाजू घेत नाही पण सर्वांच्या बाजूचे दर्शन घडवतो. कोणाचीही बाजू न घेता भावनांचे वर्णन कसे करावे याचा हे पुस्तक जणू वस्तुपाठच आहे. देहबोलीच्या निरीक्षणातील बारकावे थक्क करायला लावणारे आहेत. उदाहरणार्थ
१. - मुलाला डोक्यावरून वजन घेऊन जाताना होणारा त्रास. त्याचे ते लपवणे, पण आईच्या लक्षात येणे!
२.- जुरू (कथेचा नायक) ला पोलिसांच्या हालचालींवरून कोण वरिष्ठ पदावर आहे आणि कोण कनिष्ट पदावर आहे हे समजणे.  
३. - शाळेत जात असणाऱ्या मुलाच्या विचारातील आणि त्यामुळे होणारे देहबोलीतील बदल.
४. - चेहऱ्यावरच्या भावना लपवायला शिकलेला आदिवासी पोलीस स्टेशनवर जाऊन आल्यावर कसा त्या दाखवायला शिकतो. इत्यादी
काही लेखकांची लिखाणाची शैली इतकी उत्तम असते की त्यांच्या शब्दांमुळे आपल्या डोळ्यासमोर सहज चित्र उभे रहाते. याला word picture असे म्हणतात. विलास मनोहरांची लिखाणाची शैली अशी word picture आहे. हे एक जीव ओतून लिहिलेले पुस्तक आहे.
हे पुस्तक फक्त नक्षलवाद ह्या समस्येच्या करणावर भाष्य करत नाही तर आदिवासींचे रोजचे जीवन, आणि त्यांची जीवन जगण्याची पद्धत याबद्दलही माहिती देते. या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आदिवासींच्या जीवनात डोकावतो. त्यांच्या परंपरा, श्रद्धा, योग्य अयोग्यतेच्या कल्पनांबद्दल माहिती मिळते.
संपर्कात आलेल्या अनेक बिगर आदिवासींनी वर्षानुवर्षे आदिवासींचे केलेले शोषण किती तीव्र आहे हे सुस्पष्ट होते. आदिवासींना वाटणारी पोलिस आणि नक्षलवाद्यांची दुहेरी दहशत जाणवते. माझी नक्षलवादाच्या बातम्यांबद्दलची प्रतिक्रिया "अरे बापरे" अशी होती आणि आहे. पण सतत दहशतीखाली असणाऱ्यांची प्रतिक्रिया काय असेल याची कल्पना केलेलीच बरी. यातील बातम्यांवरून आपल्याला कितीक आणि किती खरी माहिती मिळते याबद्दलही आपण पुस्तक वाचल्यावर विचार करायला लागतो.
पोलिसांचे, फॉरेस्ट ऑफिसर्सचे वर्णन, पोलीस पाटलाचे वर्णन यातून परिस्थितीची कल्पना येते आणि हा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे याची जाणीव होते. त्यामुळे नक्षलवादाबद्दल बेजबाबदार, बेधडक विधाने करणे किमान मी तरी टाळेल याची मला खात्री वाटते.
आदिवासींना करावे लागणारे शारीरिक कष्ट, त्याकडे त्यांची बघण्याची पद्धत, त्यांची तंटा सोडवण्याची पद्धत, कपडे, शिक्षण याबद्दलचे मत यात वर्णन केले आहे. हे सगळे शहरी लोकांपेक्षा वेगळे असणारे घटक तर यात वर्णिलेले आहेतच पण त्याच बरोबर त्यांना शहरी लोकांबरोबर जोडणाऱ्या काही धाग्यांचेही यात वर्णन आहे. हे सर्व कथेच्या पार्श्वभूमीवर घडत असते.  काही प्रसंग इतके सखोल वर्णिलेले आहेत की त्यावेळी नक्की काय घडत असेल याची बरीच कल्पना येते.
हे पुस्तक नक्षलवादाच्या जन्माबद्दल आणि कारणांबद्दल भाष्य तर करताच पण त्याचबरोबर विचारांचा, भावनांचा आणि देहबोली आणि घटनांच्या निरीक्षणांचा एक खजिना आहे. ज्याची जेवढी आकलनक्षमता असेल, त्याला तेवढ्या प्रमाणात हे धन मिळतं. पोलिस, फोरेस्ट गार्ड आणि त्यांच्या मदतीला असलेले पोलिस पाटील यांनी जर आदिवासींचे इतके शोषण केले नसते, तर ही समस्या इतकी मोठी झाली नसती, किवा मुळात उभीच राहिली नसती.
हे पुस्तक मला पूर्णपणे समजले आहे असे मला काही वाटत नाही. तरीपण मला जेवढ समजले आहे ते share करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

अभिजीत सफई

ASER 2012: महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेचा पंचनामा


१७ जानेवारी २०१३, मानव संसाधन विकासमंत्री डॉ. एम. मंगपती पल्लम राजू यांच्या हस्ते, देशातील प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या असर २०१२ (ASER- Annual Status of Education Report)’ या अहवालाचे प्रकाशन दिल्ली येथे करण्यात आले. २००५ पासून, दरवर्षी, ‘असरही राष्ट्रीय पाहणी होते. दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्नशील असणार्या प्रथमया संस्थेच्या पुढाकाराने हे सर्वेक्षण केले जाते.
या सर्वेक्षणात ३-१६ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येतो तसेच ५-१६ वयोगटातील मुलांची त्यांच्या भाषेतील वाचनाची व सोपी गणिते सोडवण्याची चाचणी घेतली जाते. असर २०१२ मध्ये या चाचणीसोबतच इंग्रजीची चाचणी घेण्यात आली. ह्या चाचण्या घेण्यासाठी प्रथमने काही प्रमाणित साधने (Standard tools) तयार केली आहेत. यावर्षी असरदेशातील, यादृच्छिक पद्धतीने (Randomization) निवडलेल्या १६१६६ गावांतील ५९६८४६ मुलांपर्यंत पोहोचले (महाराष्ट्र: ९६७ गावातील २७८३४ मुलं).
देशातील मुलं शाळेत जातात का? कोणत्या प्रकारच्या शाळेत जातात? खाजगी शिकवणीला जातात का? त्यांच्या भाषेत त्यांना वाचता येतं का? सोपी गणिते सोडवता येतात का? इंग्रजी भाषेची समज कशी आहे? २०१० च्या शिक्षणाधिकाराच्या तरतुदीप्रमाणे शाळेत सोयी सुविधा आहेत का? या सारख्या प्रश्नांचा मागोवा या सर्वेक्षणात घेण्यात आला. या सर्वेक्षणाचे महाराष्ट्रासाठीचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
६-१४ वयोगटातील पटनोंदणी आणि उपस्थिती
·       ६-१४ वयोगटातील मुलांची पटनोंदणी ९८.५ % आहे व त्यापैकी ९०.५% मुले सर्वेक्षणाच्या दिवशी उपस्थित होती. तसेच, त्यादिवशी ९२.३% शिक्षक शाळेत उपस्थित होते.
·       प्राथमिक शाळांच्या तुलनेत वरच्या इयत्तेत खाजगी शाळांची पटनोंदणी अधिक आहे. १४.२% दुसरीची मुले खाजगी शाळेत जातात. ६ वीत हे प्रमाण ४८.४% आणि ८ वीत ७८.४ % आहे.
वाचनाचा स्तर
·       ५ वीच्या ४१.७% मुलांना, २ रीच्या क्षमतेचा मराठीचा मजकूर वाचता आला नाही. २०१० साली हे प्रमाण २६.९% इतके होते व २०११ साली ३६.५% झाले.
·       ५ वीत शिकणार्या आणि २रीच्या क्षमतेचा मजकूर वाचू न शकणार्या मुलांचे प्रमाण खाजगी शाळांच्या (३७.८%) तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधे (४४.७%) अधिक आहे.

गणिताचा स्तर
·       ५ वीच्या ७७.४% मुलांना ३ रीच्या क्षमतेचे भागाकाराचे गणित सोडवता आले नाही.(२०१० ५८.६%, २०११ ६७.२%)
·       ५ वीतील जवळ-जवळ अर्ध्या मुलांना हातचा असलेली वजाबाकी जमत नाही.
·       ५ वीत शिकणार्या आणि भागाकार करू न शकणार्या मुलांचे प्रमाण खाजगी (७४.२%) आणि जिल्हा परिषद शाळांमधे (७९.९%) जवळपास सारखे आहे.
इंग्रजीचे ज्ञान
·       ५ वीतील ५२.७% मुलांना सोपे इंग्रजी शब्द व २१.२% मुलांना सोपी इंग्रजी वाक्ये वाचू शकले.
·       शब्द वाचणार्यांपैकी ६४% व वाक्य वाचणार्यांपैकी ५९% मुलांना संलग्नीत अर्थ स्वतःच्या भाषेत सांगता आला.
शाळाभेटी दरम्यानची निरीक्षणे
·       महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त प्राथमिक शाळांमध्ये सर्वेक्षणाच्या दिवशी २ रीची मुले १ किंवा जास्त इयत्तांसोबत बसले होते
·       ७०% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आढळली.
·       वापरण्याजोगे शौचालय ६०% पेक्षा कमी शाळांतून आढळले. मुलींसाठी शौचालयाची वेगळी सोय असलेल्यापैकी ५३.१% शाळांमध्ये ते वापरण्याजोगे होते.
शाळेतली बरीच मुलं त्यांच्या इयत्तेपेक्षा जवळ-जवळ तीन इयत्ता मागे आहेत. शाळेच्या प्रत्येक पातळीवर शिक्षणाचा स्तर सुधारणेहे बाराव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य ध्येय आहे. तेव्हा, २०१३-१४ या वर्षासाठी मुलांचा शिक्षण स्तर काय असला पाहिजे हे त्वरित ठरविणे आवश्यक आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण, अनुश्रवण व मुल्यांकन यांच्या मदतीनेच शाळांना तो स्तर गाठता येईल.
समाधानकारक शिक्षणाशिवाय शिक्षणाची हमी निरर्थक आहे.
असर २०१२’ वाचण्यासाठी: http://www.pratham.org/file/ASER-2012report.pdf

हा अहवाल वाचताना मला पडलेले प्रश्न -
मला जमत नाही हे मुलांना कळत असेल का? की ते पळवाट शोधत राहतात? मग ते शाळेत का जातात? खिचडीसाठी??
Right To Education आल्यामुळे फायदा झाला??
मुलं मूर्त अनुभवापासून वंचित राहतात का?
सहजशिक्षण व्यापक प्रमाणात कसं देता येईल?
मी काय करू शकेन?

अतुल गायकवाड