'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 31 December 2014

सीमोल्लंघन: नोव्हेंबर-डिसेंबर, २०१४

सौजन्य: अमृता ढगे

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

दोन प्रयोग:
            निर्माणच्या नियमित प्रक्रियेला पूरक अशी दोन प्रायोगिक कार्यशाळा सर्चमध्ये झाल्या. IIT मुंबईतील TATA Center for Technology & Design चे ३३ फेलोज व प्राध्यापक आणि गुजरातमधील MD (Preventive & Social Medicine) चे ३९ विद्यार्थी या कार्यशाळांत सहभागी झाले होते.

            दोन्ही कार्यशाळांतील युवांचे वय निर्माणच्या युवांच्या सरासरी वयापेक्षा जास्त होते. दोन्ही कार्यशाळांतील युवा post graduation करत असून पुढील १-२ वर्षांत ते आपले कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करून करीअर सुरू करतील. अशा युवांना गडचिरोलीतील case studiesfield visitsच्या माध्यमांतून Bottom of Pyramid बद्दल व त्यांच्या समस्यांबद्दल जाणीव व्हावी, सर्चचा action-research च्या माध्यमातून problem solving approach त्यांच्या-पर्यंत पोचावा व त्यांना आपल्या ध्येयाबद्दल स्पष्टता यावी असे या कार्यशाळांचे ध्येय होते. अमराठी युवांच्या निर्माणसदृश कार्यशाळा कशा आयोजित कराव्या याबद्दल निर्माण टीमचे शिक्षण झाले. 
            IIT मुंबईच्या कार्यशाळेतील युवक करण वोहरा याने आपल्या कुंचल्यातून ही कार्यशाळा चित्रबद्ध केली असून (उजवीकडील चित्र) लवकरच या शिबिराची चित्रपुस्तिका तो आपल्यासोबत शेअर करेल.

या कार्यशाळेला लोकमत Oxygen ने उत्तमरित्या कव्हर केले. 
Oxygen मधील लेखाची लिंक http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=1220

लाईक?
बदलत्या कालानुसार अखेर निर्माणचे अधिकृत फेसबुक पेज सुरू झाले आहे. या पेजवर पुढील गोष्टी update केल्या जातील:
१.      सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या संधी व फेलोशिप
२.      निर्माणसंबंधित घडामोडी
३.      सीमोल्लंघनमधील ठराविक बातम्या
या पेजचा पत्ता: https://www.facebook.com/nirmanforyouth
तरी या पेजला भेट द्या. लाईक करा. आणि पुन्हा पुन्हा भेट देत रहा...

गडचिरोलीच्या मलेरियाशी दोन-दोन हाथ

गडचिरोली-पावसाळा-मलेरियाची साथ हे दरवर्षीचं समीकरण. हे समीकरण सोडवण्याची जबाबदारी सर्चचे मोबाईल मेडिकल युनिट सांभाळणाऱ्या भूषण देववर आली. ते सुटले का? ते सोडवण्याची काय प्रक्रिया होती? त्यादरम्यान भूषणचे काय शिक्षण झाले? वाचूया त्याच्याच शब्दांत...

मलेरिया हा गडचिरोली जिल्ह्यासाठी एक मोठा 'थंडी वाजून ताप आणणारा' प्रश्न आहे. २०११-१२ च्या सरकारी आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या १% पेक्षाही कमी आहे. मात्र महाराष्ट्रातील मलेरियाच्या एकूण रूग्णांपैकी जवळपास १४% रूग्ण गडचिरोली जिल्ह्याचे आहेत. मलेरियाचे प्रामुख्याने Plasmodium-vivax (PV) व Plasmodium-falsiparum (PF) हे दोन प्रकार भारतात आढळून येतात. यापैकी PF मलेरियाचा उपचार जर झाला नाही तर तो जीवघेणा ठरतो. PF मालेरियाचेच रुपांतर cerebral (मेंदू) मलेरिया मध्ये होते, व ह्याच PF मलेरियाचे रूग्ण गडचिरोलीत प्रामुख्याने दिसून येतात (75%). मुंबईत हेच प्रमाण ८% आहे. गडचिरोलीचा मलेरिया chloroquine resistant आहे. (chloroquine हे औषध सामान्यतः मलेरियाच्या उपचारासाठी सर्वत्र वापरले जाते.)
            साधारण पावसाळ्या नंतर मलेरियाचे प्रमाण वाढते. मलेरियाशी दोन हाथ करण्यासाठी मी व सर्चच्या मोबाईल मेडीकल युनिटची (MMU) आमची सर्व टीम सज्ज होतो. ४५ आदिवासी दुर्गम गावांचा मलेरिया नियंत्रण करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता.
            ऑगस्ट महिन्यात काही गावात साधारण एक-दोन मलेरियाचे रूग्ण आढळून येऊ लागले. ह्या महिन्यात ४५ गावांतील एकूण १२००० लोकसंखेपैकी २२ मलेरियाचे रूग्ण आढळून आले. मलेरियाची चाहूल लागली होती. मलेरियाचे प्रमाण इथून पुढे वाढणार हे लक्षात आले, व त्यानुसार आम्ही आमची जय्यत तयारी सुरु केली. MMU ऑफिसला war रूमचे रूप दिले. दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे कोंदावाही व त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये मलेरियाचे प्रमाण खूप जास्त असते. म्हणून ह्या गावांच्या महिन्यात एकऐवजी दोन-दोन भेटींचे नियोजन केले. औषधे, मलेरियाचे गावातल्या गावात तात्काळ निदान करण्यासाठीचे RDK(Rapid Diagnostic Kit) हे सुद्धा मुबलक प्रमाणात आधीच उपलब्ध करून घेतले होते. सोबतच लोकांमध्ये जागृतीसाठी आम्ही गावा-गावात आरोग्यशिक्षण करण्याचेही नियोजन केले. मालेरीया war साठी लागणारी सगळी हत्यारे आमच्याकडे होती.
             सप्टेंबर महिना आला. आता शत्रू बळकट होत चालला होता. ह्या महिन्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या एकदम २२ वरून ११९ वर गेली व ऑक्टोबर मध्ये ही संख्या ११४ वर राहिली. आता आम्ही थोडे अधिक सतर्क झालो. आमचे प्रयत्न सुरूच होते जास्तीत जास्त रुग्णांना उपचार करण्याचे.
            नोहेंबर महिना सुरु झाला. पहिल्याच दिवशी कोंदावाही ह्या गावात गेलो तिथे तर ५०० लोकसंख्येत तब्बल ७१ मलेरियाचे रूग्ण आढळून आले. आता परिस्थिती फारच गंभीर होत चालली होती. सर्चच्या रुग्णालयात सुद्धा रूग्णांची संख्या वाढत होती व मेंदूच्या मलरियाचे रूग्णसुद्धा आता आढळून येऊ लागले.
            आम्ही आमच्या war रूम मध्ये बसून कुठल्या गावात मलेरियाचे प्रमाण अधिक आहे हे शोधून काढलं. ह्यादरम्यान वेळोवेळी योगेश दादचे मार्गदशन मिळतच होते. मलेरियाग्रस्त गावांसाठी विशेष कृती कार्यक्रम आखला. आम्ही तातडीने दंतेश्वरी सेवकांचे शिबीर आयोजित केले. त्यात त्यांना मलेरियाच्या वाढत्या प्रमाणाची व त्यावर नियंत्रण व निदान करण्याची तसेच गंभीर रूग्ण ओळखून सर्चला रेफर करण्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या गावात मलेरियाचे प्रमाण कुठे जास्त आहे हे जाणून घेऊन आम्ही आमची भेट प्राधान्यक्रमाने त्या गावांत देण्याची तयारी केली. त्या गावांत २ भेटी द्यायच्या ठरवल्या. मलेरियाचे आरोग्यशिक्षण केले व मच्छरदाणीचा वापर करण्यास आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली. निरीक्षणातून असे लक्षात आले की मच्छरदाणी ही भारीत करण्याची (औषधीत बुडविण्याची) खूप गरज आहे. दर सहा महिन्यांनी मच्छरदाणी भारीत करावी लागते. भारीत न केलेल्या मच्छरदाणीचा उपयोग होत नाही. त्यासाठी आम्ही शासनाकडे डेल्टामिथ्रीन नावाच्या औषधाची मागणी केली. (या औषधाचा उपयोग मच्छरदाणी भारीत करण्यासाठी होतो. हे औषध शासनामार्फतच मिळू शकते.). धक्कादायक बाब म्हणजे ऐन मलेरियाच्या साथीत शासनाकडे हे औषधच उपलब्ध नव्हतं. तसेच ACT ची लहान मुलांसाठीची एकही गोळी शासनाकडे उपलब्ध नव्हती. ACT हे औषध PF मलेरियाच्या उपचारासाठी देतात. सर्चने वर्तमानपत्रे व टीव्ही न्यूज चॅनल्स यांच्यामार्फत आवाज उठवल्यानंतर शासनाने डेल्टा मिथ्रीन त्वरित उपलब्ध करून दिले. प्रत्येक गावातील दंतेश्वरी सेवकाला हे औषध देण्यात आले व गावातील मच्छरदाण्या भारीत करण्याचे काम त्यांनी केले.
            नोहेंबर महिन्यात सगळ्यात जास्त ४१० रूग्ण आढळून आले. ह्या सगळ्याचा उपचार करण्याचा दिव्य अनुभव आम्ही घेतला. आता मालेरियाचे प्रमाण भरपूर कमी आहे. मलेरियाचे प्रमाण जास्त का अढळले? तर ह्यावर्षी पाऊस हा उशिरा अनियमित आला व त्यामुळे मच्छरवाढीला अनुकूल असे वातावरण होते.
            ह्या मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात माझे खूप मोठे पब्लिक हेल्थचे शिक्षण झाले. मोठ्या प्रमाणावर एखाद्या रोगाचे नियंत्रण कसे करावे हे शिकायला मिळाले. टीमवर्क किती महत्वाचे आहे हे सुद्धा लक्षात आलं. निर्माणच्या ५.२ शिबिरात जे मलेरिया, डायरिया इ. आजारांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी जे ग्रुप Presentation केले ते काम प्रत्यक्ष करण्याची संधी ह्यातून माला मिळाली. शिबिरादरम्यान किंवा शिकत असताना रोगचिकित्सा व त्याच्या नियंत्रणाबद्दल लिहिणे, वाचणे व त्याविषयी बोलणे मजेशीर व कधी-कधी भीतीदायक असते. परंतु प्रत्यक्षात तो एक संघर्ष असतो. परंतु तो वेगळाच आनंद व समाधान आपल्याला देवून जातो.

 स्रोत: भूषण देव, drbhushandeo@gmail.com

निर्माणीच्या नजरेतून



'निर्माणीच्या नजरेतून' साठी फोटो धुंडाळताना मुक्ता नावरेकर ला सापडलेले हे दोन फोटो आणि त्यामागची कहाणी ..
            “जव्हारला एका गावात गेलो तेव्हा आम्हाला दारूच्या नशेतल्या एका म्हातारीने पकडलं आणि पैसे मागू लागली (या गावाला पिदाडांचं म्हणजे दारू पिणार्‍यांचं गाव म्हणूनच ओळखतात). मग सहज लक्ष गेलं तर तिच्या घरात एक कुपोषित बाळ दिसलं. चौकशी केल्यावर कळलं की त्या बाळाची आई ३ महिन्यापूर्वी वारली, ती सुद्धा दारू प्यायची, बाळाचे वडीलही दारू पितात. मग निर्माणच्या काही डॉक्टर मित्रांना (काय करता येईल ते) विचारलं. त्यांच्या सांगण्यावरून आधी आशा, अंगणवाडी ताईंना भेटण्याचा प्रयत्न केला. नंतर संजय पाटीलांच्या मदतीने जव्हारच्या सरकारी दवाखान्यात कळवलं. तिथले डॉक्टर काही सहकार्‍यांबरोबर गावात गेले तर आजीबाई पुन्हा दारूच्या नशेत ! तिने एवढी शिवीगाळ केली की त्यांनाही पळ काढावा लागला.
            नंतर एकदा तिने त्या बाळाला दवाखान्यात अॅडमिट केलं खरं, पण काही दिवसानंतर ती पळून घरी आली. मग पुन्हा डॉक्टर मित्रांच्या सांगण्यावरून बाळाला म्हशीचं दूध सुरु केलं. सुरवातीला स्वतःच नेउन दिलं, मग तिला पाणी घालून गरम करायला शिकवण्याचा प्रयत्न केला. तो थोडा यशस्वी झाला. मग गावातलाच गवळी तिला रोज दूध देऊ लागला. ( मी जव्हारला फक्त ५-६ वेळाच गेले, त्यामुळे फार पिच्छा करू शकले नाही) शुभदा त्याला महिन्याचे पैसे देऊन ठेवायची. २ महिन्यात बाळाची तब्येत थोडी सुधारली. दुसऱ्या फोटोत जरा फरक दिसतोय. पण आजीची दारू आणि वडिलांचा नाकर्तेपणा सुरूच आहे. त्या बाळाची ४-५ वर्षांची बहीण दिवसभर त्याला सांभाळते.. आजी शुद्धीवर असेल तर भात शिजवते. वडील बडबड करतात, आणि अंगणवाडी ताई कधीच भेटत नाही..”

स्रोत: मुक्त नावरेकर, muktasn1@gmail.com

पुस्‍तक परिचय

 गंगेमध्‍ये गगन वितळलेअंबरीश मिश्र
            गांधींविषयीचे पुस्‍तक या कुतूहलापोटी गंगेमध्‍ये गगन वितळले हे पुस्‍तक वाचायला घेतले. गांधींचा राजकीय, आध्‍यात्मिक, वैचारिक प्रवास श्री अंबरिश मिश्र यांनी या पुस्‍तकातून मांडला आहे. गांधीचे चरित्र माहित असणार्‍यांनाही हे पुस्‍तक वाचावेसे वाटेल, कारण या पुस्‍तकांत गांधीच्‍या जीवनमार्गाचा त्रयस्‍थपणे विचार केलेला आहे. काळाच्‍या पटावर मोहनदास गांधी ते महात्‍मा गांधी असे उलगडत जाणारे गांधी आपल्‍याला समजतात. गांधीच्‍या मोठेपणाबरोबरच त्‍यांच्‍या प्रयोगातील यश-अपयश देखील लेखकाने छान विशद केले आहे.
            दक्षिण आफ्रिकेमध्‍ये विचारांची जडणघण होत असतानाचे गांधी, फिनिक्‍स, टॉलस्‍टॉय आश्रमात प्रयोग करताना अपयश आल्‍यास, प्रयोग बंद करून ‘अजून पुष्‍कळ परिवर्तन करावे लागेल’ असे म्‍हणारे गांधी आपल्याला या पुस्तकात सापडतात.
            गांधींची माणसं जोडण्‍याची कला, त्‍यांचं संघटनकौशल्‍य, थक्‍क करून टाकणारं असं आहे. महादेवभाई, जमनालालजी बजाज, हरिलाल गांधी, मनुबेन गांधी यांच्या नरजेतील गांधीजी आपल्‍याला कळतात. त्‍यांचातले पत्रसंवाद, ‘गीता, सत्‍याग्रह, जीवन कसे जगावे’ या विषयी होणारी चर्चा, या गोष्‍टींचा घटनाक्रम आपल्‍यासमोर उभा राहतो. तसेच महादेवभाई, जमनालालजी बजाज व यांसारख्‍या निष्‍ठावान सहकार्‍यांची सर्मपणवृत्‍तीही दिसून येते. राष्‍ट्रीय चळवळीचा तो मंतरलेला काळ, गांधीच्‍या नेतृत्‍वाखाली प्राणपणाला लावून स्‍वांतत्र्ययुध्‍दात उतरलेली असंख्‍य माणसं, त्‍यांचे क्‍लेश-आनंद, गांधींनी लोकसहभागातून उभी केलेली चळवळ, त्‍यातले चढउतार, त्‍या चळवळीतली माणसं, त्‍यांचे भले-बुरे अनुभव या साऱ्या गोष्टी पुस्तकातील महादेवभाईंच्या प्रकरणांमधून उलगडत जातात.
            लेखक मनुबेन गांधी यांना सत्‍तांतराच्‍या महानाट्याची निरूपक म्‍हणून संबोधतात. देशाच्या फाळणीच्या साक्षीदार असणाऱ्या मानुबेन गांधींच्या दैनंदिनीतील गांधीजीचे अहिंसेबद्दलचे विचार विशेष उल्लेखनीय वाटले. फाळणीपेक्षाही देशभर उसळलेल्‍या हिंसाचाराने आणि रक्‍तपातानं गांधीजी खिन्‍न झाले होते. ‘आज विरोचित अहिंसेची गरज आहे’ असे म्हणणारे गांधीजी, दुर्बलतेतून पत्करलेल्या अहिंसेपेक्षा सक्षम असताना पालन केलेल्या अहिंसेचे महत्व अधोरेखित करतात आणि वीरत्व आणि अहिंसेची अद्भुत सांगडही घालून देतात.
            अहिंसा आणि सत्‍याचा छिन्‍नी हातोडा घेउन नवभारताचं शिल्‍प साकारण्‍यात आपण कमी का पडलो, यांची विस्‍तृत कारणमीमांसा लेखकाने केली आहे. विज्ञानवाद- समाजवाद- निधर्मीवाद- पंचवार्षिक योजना- भाक्रा धरण या सगळया गोष्‍टींमध्‍ये ग्रामपातळीपर्यंत सत्‍तचे विक्रेद्रीकरण, सार्वजनिक निधीचा चोख हिशेब, जबाबदारीचं तत्‍व अशा गांधींच्‍या गोष्‍टी मागे कशा पडत गेल्‍या याची जाणीव करून देतो.
            सत्‍य, अहिंसा, दया, क्षमाशीलता या उदात्त तत्त्वांपेक्षा गांधी आपली दैनंदिन कामे कसे करत, एखांदं छोंटं कामदेखील किती कौशल्‍याने, चिकाटीने करत, यांचे वर्णन लेखक करतो. गांधींमधला पत्रकार, त्‍यांचं व्‍यवस्‍थापन कौशल्‍य, या गुणांची जाणीव आपल्‍याला होते.
            थोर नेत्‍यास दैवत न मानता, त्‍याचा सर्वप्रथम माणूस म्‍हणून विचार करायला हवा ही नवी दृष्‍टी या पुस्‍तकाने मला दिली.

ऋतगंधा देशमुख, hrt.deshmukh@gmail.com

निर्माणीच्या नजरेतून















पाणी प्रश्न!
 उन्हाळापावसाळाहिवाळा.... कोणताही ऋतू असो... पाणी घरपोच कधीच नाही. याचे उत्तर कोणाकडे मागवे/ आम्हाला मदत कोण करणार असे आमच्या गावातील लोकांचे प्रश्न. आम्ही गावकरी यावर काही उत्तर स्वत:च  निर्माण करू शकू काहा प्रश्नच पडत नाही आणि प्रश्न पाडायला वेळही नाही.
स्रोत: अश्विन भोंडवे, ashwin.bhondave@gmail.com 

कविता

MAKE THE ORDINARY COME ALIVE

Do not ask your children
to strive for extraordinary lives.
Such striving may seem admirable,
but it is the way of foolishness.
Help them instead to find the wonder
and the marvel of an ordinary life.
Show them the joy of tasting
tomatoes, apples and pears.
Show them how to cry
when pets and people die.
Show them the infinite pleasure
in the touch of a hand.
And make the ordinary come alive for them.
The extraordinary will take care of itself.

-William Martin

Saturday 1 November 2014

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

निर्माण ६ येत आहे...
गेले दोन-तीन महिने सुरू असणारी निर्माण ६ ची निवडप्रक्रिया अखेर पूर्ण झाली. Concern (सामाजिक समस्यांविषयी तळमळ), Drive (त्या समस्यांवर काम करण्यासाठी धडपड करण्याची तयारी) आणि Talent (त्या समस्या सोडवण्याची क्षमता) हे निवडीचे मार्गदर्शक निकष होते. निर्माण ६ करिता महाराष्ट्राच्या २९ जिल्ह्यांतून ४२६, तर महाराष्ट्राबाहेरून १० अर्ज आले होते. यांपैकी ३०७ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील १६४ जणांची (मुले-९४, मुली ७०) निवड निर्माणच्या शिबिरांसाठी झाली आहे. या बॅचमध्ये नुकतेच बारावी झालेला मुलगाही आहे. त्याचप्रमाणे BAMS, MA, LLB इ. शिकून पोलीस खात्यात असणारा व दोन पुस्तकांचा लेखक असणारा मुलगाही आहे. या बॅचचे सरासरी वय २२ वर्षे असल्याने सरासरी ३५ वय असणाऱ्या आमच्या निर्माण कार्यकारी टीमला खूप उत्साहाचे भरते आले आहे.
मुलाखतींदरम्यान तुमच्यापैकी अनेक जणांना खूप महिन्यांनी भेटता आले. अनेकांनी मुलाखतींच्या आयोजनाची किचकट  जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. अनेक जण सुट्टी घेऊन मुलाखती घ्यायला आले. मुलाखतींसाठी आपली घरे-दारे उघडी करून दिली. पावसाची पर्वा न करता ऐन वेळी करावी लागणारी पळापळ केली. आमच्या टीमला जेवू घातले. तुम्ही नसताना तुमच्या आई-बाबांनीही खूप मदत केली. सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद!

सीमोल्लंघनला तीन वर्षे पूर्ण...
निर्माण शिबीरे झाल्यानंतर सीमोल्लंघन आपल्याला जोडून ठेवते. २०११ दसऱ्याच्या निमित्ताने निर्माणच्या युवांचे धाडस इतरांपर्यंत पोचवण्यासाठी सीमोल्लंघनचा उपद्व्याप सुरू झाला. त्याला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे धाडस करत राहून बातम्या निर्माण करणाऱ्या तुम्हा सर्वांचं, या बातम्या सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आपला मौल्यवान वेळ काढणाऱ्या पत्रकारांचं, प्रामाणिकपणे आपले चढ-उतार शेअर करणाऱ्यांचं, सर्वांचे शिक्षण व्हावे म्हणून स्वानुभव - पुस्तक परिचय – वैचारिक लेख – वैचारिक कविता पाठवणाऱ्या मित्रांचं - मार्गदर्शकांचं, तणावपूर्ण वातावरणात हसवणाऱ्या व्यंगचित्रकार व छायाचित्रकारांचं मनापासून अभिनंदन !

चौथा ऑक्टोबर वर्कशॉप, वर्ष २०१४
   
         सालाबाद प्रमाणे निर्माणची ऑक्टोबर कार्यशाळा ९ ते १२ ऑक्टोबर २०१४ दरम्यान सर्च, शोधग्राम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. निर्माणची शिक्षण प्रक्रिया पूर्ण करून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेचे हे चौथे वर्ष! तीन दिवसांच्या या हृद्य अनुभवाबद्दल शिबिरार्थीनी दिलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया –

            “निर्माणच्या शिबिरांमधून मिळणारी उर्जा आणि उत्साह शब्दात पकडण अवघड आहे. या वेळच्या ऑक्टोबर कार्यशाळेतले बहुतांश चेहरे मला नवीन होते.पण प्रत्येकाचा प्रवास ऐकल्यावर अस वाटलं की मी या सगळ्यांना खूप पूर्वीपासून ओळखते.प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, वाट वेगळी, अडचणी वेगळ्या, आणि तरी सगळे एकमेकांचे सोबती...
            ‘विकास’ म्हणजे काय? आणि विकास कोणासाठी? याचा विचार न करता विकासाची स्वप्न बघणाऱ्यांच्या गर्दीत वास्तवच भान असलेला हा कोपरा मला तरी खूप सुरक्षित वाटला.”
अमृता प्रधान, निर्माण २
         
            “ही माझी पहिलीच ऑक्टोबर कार्यशाळा होती. कॅम्पला येण्याआधी नुकताच जॉब सोडला होता. त्यामुळं ‘फिअर ऑफ फ्रीडम’ अशा काहीशा मनस्थितीत होतो. इथे निर्माण प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे मित्र एकाच वेळी भेटले. त्यांचं काम, त्यांच्या अडचणी, त्यातून काढलेले मार्ग, त्यांच्या प्रेरणा, निराशा, काहींच फोकस्ड असणं, तर काहींच भरकटणं, यातून बरच काही शिकता आल. निर्माणवाल्यांचा प्रवास साधारणपणे कसा असतो याच एक चित्र तयार झालं. कॅम्प संपताना अस वाटत होतं की ‘देवाच्या दयेने भरपूर स्वातंत्र्य मिळत आहे तर ते नाकारण्याचा नाकर्तेपणा करू नये, ते नीट वापरावं.’ ”
निरंजन तोरडमल, निर्माण ५

                “हा माझा पहिला ऑक्टोबर वर्कशॉप. ग्रामीण भागात काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव असल्याने शिबिरात झालेलं ‘सामाजिक क्षेत्रात कामाचे मूल्यमापन का आणि कसे करावे?’ हे सेशन (माझ्यासाठी) फार उपयोगी होतं. मी (सध्या) जे काम करत आहे तसच काम निर्माणचे बरेच मित्र-मैत्रिणी करत आहेत. शिबिराच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली आणि त्याचं काम, कामाची पद्धत समजून घेता आली. त्यांच्या अनुभव कथनातून आणि केलेल्या प्रयोगांमधून मला माझ्या कामाकडे विविध अंगांनी बघण्याची दृष्टी मिळाली.
कामाच्या धावपळीत सर्चची ही भेट आणि शेअरिंग ‘एनर्जी बूस्टर’ होती. अम्मा, नायना, आणि सर्व निर्माणींना भेटून अजून जोमाने काम करण्याची उर्जा मिळाली.”

कल्याणी राऊत, निर्माण ५

“आधी कंपन्या बंद करा...”

गडचिरोली तंबाखूमुक्ती अभियाना अंतर्गत जनजागृतीसाठी निर्माणच्या व निर्माणमध्ये येऊ घातलेल्या युवांनी एक आठवडा दिला. बस स्टँड, शाळा, खेडी इ. ठिकाणी जागृतीचे काम करताना या मुलांचा थेट वास्तवाशी सामना झाला. यानंतर प्रतीक वडमारेच्या (निर्माण ६) मनात काय तरंग उमटले?


बस स्टँडवर पोस्टर प्रदर्शनीसह प्रतीक
            महाराष्ट्रात जो तंबाखू बंदीचा कायदा झालाय त्या कायद्याबद्दल लोकांना सजग करण्यासाठी SEARCH आणि इतर काही शासकीय आणि अशासकीय संस्थांच्या वतीने "तंबाखू मुक्त गडचिरोली " अभियान राबवण्यात आल. त्यात भाग घेण्यासाठी २४ ऑगस्टला गडचिरोलीला गेलो होतो . २ दिवसांच्या ट्रेनिंगनंतर आम्हा मुलांचे २-२ चे गट करून प्रत्येक गटाला ४ गावे याप्रमाणे गावे विभागून करण्यात आली होती.
आम्हाला दिलेल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही शाळांमध्ये कार्यक्रम घेतले, गावातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, लोकांची मते जाणून घेतली. प्रत्येक गावात आम्ही जेंव्हा तंबाखूच्या दुष्परिणामांची, कायद्याची माहिती लोकांना द्यायचो त्यावेळी बहुतांश लोकांचा एकाच सूर असायचा,आधी कंपन्या बंद करा! दरवेळी समोरच्याला ओरडून सांगाव वाटायच “अरे, उद्या कंपन्यावाले पानठेल्यांवर विष विकायला लागले तर तू तेही विकत घेणार आहेस का
s s s (पण मी असं काही कोणाला बोललो नाही ). चौथ्या दिवशी तर मी इतका वैतागलो होतो की मला आणखी एकदा कोणी म्हणाला असता की कंपन्या बंद करा तर विचारू नका काय केल असत मी त्याच...
            या अभियानाच्या निमित्ताने समाजसेवा/ सुधारणा हा काय भयानक (चांगल्या अर्थाने ) प्रकार आहे हे कळले. आजवर फक्त पुस्तकात समाज सुधाराकांबद्दल  वाचल होतं. पण समाजातील कुठल्याही वाईट गोष्टीवर बोट ठेवताना त्यांना काय दिव्य करावं लागत असेल याची थोडीफार प्रचीती आली. लोकांमध्ये तंबाखूबद्दल अज्ञानच इतक होतं की तंबाखू खाणं चुकीचं आहे हेच त्यांच्या गावी नव्हतं. गावांमध्ये मुलाला दुधाचे दात आले के त्याने तंबाखू खाणं नॉर्मल समजतात. सुशिक्षित आणि त्यातल्या त्यात तंबाखू न खाणाऱ्याचं प्रमाण कमीच.
            या ४ दिवसांमध्ये positive response देणारेही लोक भेटले. शाळा ,कौलेजमधील मुलांचा छान प्रतिसाद मिळाला. आम्ही तंबाखू सोडू, आमच्या मुलांना देणार नाही असं म्हणणारे लोकही भेटले. काही मोजक्या लोकांनी आमच कौतुकही केल. पण जर सुरुवात लोकांच अज्ञान घालवणे, त्यांचे समज बदलण्यापासून असेल तर या कामासाठी खूप वेळ लागणारेय हे नक्की. अर्थात अशा एखाद-दुसऱ्या कार्यक्रमाने लोक तंबाखू खाणे सोडतील अशी अपेक्षा करता नाही येणार, पण शाळा, कॉलेज मधील मुलांनी कमीत कमी या निमित्ताने तंबाखू वाईट आहे हा विचार केला तरी मी याला या अभियानाच यश समजतो.
            या अभियानाच्या निमित्ताने खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. डॉ. अभय बंग यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. निखिल, अमृत आणि SEARCH मध्ये काम करणाऱ्या इतर तरूण मित्रांना जवळून पाहता आलं. स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून स्वतःच स्वतःवर घातलेल्या मर्यादा ओलांडल्यामुळे एकंदरीतच स्वतःकडे आणि आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. स्वतःला फाsssर सिरीअसली घेण्यात काही अर्थ नाही हे पुन्हा एकदा नव्याने कळलं..
            मी गडचिरोलीला गेलोय म्हणल्यानंतर जनरली लोकांच अस मत होतं / होईल की मी पण लागलो समाज सेवेच्या नादाला. पण मला मुळात समाज सेवा हा प्रकारच पटत नाही. मी काहीतरी मोठा त्याग करून समाजासाठी काहीतरी करतोय ही भावनाच मला मुळात पांचट वाटते (कदाचित यातूनच मी समाजाचा मालक असल्याची भावना आपल्या नेत्यांमध्ये येत असावी असही मला वाटतं) समाजासाठी कोणी काही करत नसतं या मताचा मी पक्का आहे.
            असो परत आल्यानंतर मला सगळ्यांना (त्यातल्या त्यात माझ्या मित्रांना ) आवर्जून सांगावं वाटत होतं बेट्यांनो भाग घ्या या मोहिमेमध्ये or at least go through the selection procedure of NIRMAN, you might find a whole new world waiting to be explored...
प्रतीक वडमारे, pratikwadmare@gmail.com
(अभियांत्रिकीची पदवी घेतलेला प्रतिक मूळ अंबेजोगाईचा आहे. त्याची निर्माण ६ साठी निवड झाली आहे.)

Tuesday 1 July 2014

कविता

सर्वात बुद्धीचा प्राणी!


खोदून काढली खनिजे
उकरून खोलवर खड्डे
शोषून घेतले पाणी
पाडून खोलवर भोके

बांधून नद्यांवर धरणे
आटवले प्रवाह अवघे
हटवले किनारे सागर
बांधले जुगारी अड्डे

देऊन ध्रुवाला चटके
ते बर्फ कवच वितळवले
फाडून हवेची वस्त्रे
पृथ्वीस भिकारी केले

अन म्हणतो आम्ही त्याला
सर्वात बुद्धीचा प्राणी
आईस करी हा नग्न
करी विनाश तो आपलाही

अनिल अवचट

Thomas Piketty’s “Capital”, summarised in four paragraphs

गेले अनेक महिने ज्या पुस्तकाने खळबळ उडवून दिली ते हे Thomas Piketty या फ्रेंच अर्थतज्ञाचे पुस्तक. ‘इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाने पिकेटी यांचा ‘आधुनिक मार्क्स’ असा उल्लेख केला आहे. एका दशकाहूनही अधिक काळ चाललेल्या संशोधनावर आधारित जागतिक विषमतेचा आढावा घेणारं हे पुस्तक. या पुस्तकाचा ‘इकॉनॉमिस्ट’ मधीलच परिचय:

How to persuade audiences to action

कोणतेही सामाजिक काम करताना लोक केंद्रस्थानी असतात. लोकांच्या सहभागाशिवाय काम पुढे जाउच शकत नाही. कामाच्या विविध टप्प्यांवर लोकांशी संवाद साधावा लागतो. सागर आबनेला रचनावादी शिक्षणाच्या त्याच्या प्रयोगांत पालकांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्याशी बोलावे लागते, आकाश बडवेला दंतेवाड्यातील शेतकऱ्यांना SRI पद्धतीची उपयुक्तता पटवून देण्यासाठी त्यांच्याशी बोलावे लागते, अमृत बंगला निर्माणबद्दल कॉलेजच्या तरुण-तरुणींशी बोलावे लागते. रुग्ण-निदान व उपचार, शेतीच्या विविध प्रक्रिया, शाळा-कॉलेजेसमध्ये शिकवणे ही जशी महत्त्वाची कौशल्ये आहेत, तसेच व तितकेच महत्त्वाचे संवाद कौशल्य आहे. या कौशल्याला धार देण्यासाठी कळीचे मुद्दे सांगणारा The Hindu या दैनिकात आलेला हा एक उपयुक्त लेख:
http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-opportunities/how-to-persuade-audiences-to-action/article5939075.ece

Epigenetics

एखाद्या गायकाचा मुलगा/मुलगी सहजपणे उत्तम गाऊ लागतात. एखाद्या खेळाडूची मुले खूप कमी वयातच नैसर्गिकपणे खेळू लागतात. आई-बाबा हुषार असतील तर मुलेही (शक्यतो) हुषारच असतात. आई-बाबा सामाजिक काम करत असतील तर मुलेही सहजपणे गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या लोकांशी संवाद साधू लागतात. पण आपले आई-बाबा गायक, खेळाडू, लेखक, चित्रकार, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांपैकी कोणीच नसतील तर?
आपले जीन्स आपले आयुष्य नियंत्रित करतात या लोकमान्य समाजाला तडा देणारे Epigenetics या शाखेचे संशोधन. आपल्या आयुष्याचे नियंत्रण आपल्या हातात देणाऱ्या या संशोधनाविषयी सांगणारा लेख:

Monday 30 June 2014

सोन्याबापू

साप्ताहिक साधना मधील संतोष पद्माकर पवार यांच्या सुंदर कविता. (‘साधना’चे संपादक श्री. विनोद शिरसाट यांनी ‘साधना’मधील लेख/कविता वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार.)



Wednesday 30 April 2014

कविता

है अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना है
कल्पना के हाथ से कमनीय जो मंदिर बना था
भावना के हाथ ने जिसमें वितानों को तना था
स्वप्न ने अपने करों से था जिसे रुचि से सँवारा
स्वर्ग के दुष्प्राप्य रंगों से, रसों से जो सना था
ढह गया वह तो जुटाकर ईंट, पत्थर, कंकड़ों को
एक अपनी शांति की कुटिया बनाना कब मना है
है अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना है
बादलों के अश्रु से धोया गया नभ-नील नीलम
का बनाया था गया मधुपात्र मनमोहक, मनोरम
प्रथम ऊषा की किरण की लालिमा-सी लाल मदिरा
थी उसी में चमचमाती नव घनों में चंचला सम
वह अगर टूटा मिलाकर हाथ की दोनों हथेली
एक निर्मल स्रोत से तृष्णा बुझाना कब मना है
है अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना है
क्या घड़ी थी, एक भी चिंता नहीं थी पास आई
कालिमा तो दूर, छाया भी पलक पर थी छाई
आँख से मस्ती झपकती, बात से मस्ती टपकती
थी हँसी ऐसी जिसे सुन बादलों ने शर्म खाई
वह गई तो ले गई उल्लास के आधार, माना
पर अथिरता पर समय की मुसकराना कब मना है
है अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना है
हाय, वे उन्माद के झोंके कि जिनमें राग जागा
वैभवों से फेर आँखें गान का वरदान माँगा
एक अंतर से ध्वनित हों दूसरे में जो निरंतर
भर दिया अंबर-अवनि को मत्तता के गीत गा-गा
अंत उनका हो गया तो मन बहलने के लिए ही
ले अधूरी पंक्ति कोई गुनगुनाना कब मना है
है अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना है
हाय, वे साथी कि चुंबक लौह-से जो पास आए
पास क्या आए, हृदय के बीच ही गोया समाए
दिन कटे ऐसे कि कोई तार वीणा के मिलाकर
एक मीठा और प्यारा ज़िन्दगी का गीत गाए
वे गए तो सोचकर यह लौटने वाले नहीं वे
खोज मन का मीत कोई लौ लगाना कब मना है
है अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना है
क्या हवाएँ थीं कि उजड़ा प्यार का वह आशियाना
कुछ आया काम तेरा शोर करना, गुल मचाना
नाश की उन शक्तियों के साथ चलता ज़ोर किसका
किंतु निर्माण के प्रतिनिधि, तुझे होगा बताना
जो बसे हैं वे उजड़ते हैं प्रकृति के जड़ नियम से
पर किसी उजड़े हुए को फिर बसाना कब मना है
है अँधेरी रात पर दीवा जलाना कब मना है
                                 -         हरिवंश राय बच्चन