'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 10 July 2013

जळगाव परिसरातील सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी अद्वैत दंडवते व सहकाऱ्यांची वर्धिष्णू !

अद्वैत दंडवते, सुशील जोशी (दोघेही निर्माण ४), अद्वैतची पत्नी प्रणाली व त्यांच्या ४ अन्य सहकाऱ्यांनी जळगाव परिसरातील सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून Vardhishnu - Social Research & Development Society ही सामाजिक संस्था सुरू केली आहे. केवळ देणगी/दान या मार्गांचा उपयोग न करता प्रश्नांचा सखोल अभ्यास करून प्रश्न समूळ सोडवण्यासाठी त्यांवर नेमके उपाय शोधण्यावर वर्धिष्णूचा भर राहणार आहे. ११ जुलै रोजी या संस्थेचे अधिकृत उद्घाटन खानदेशातील ज्येष्ठ कार्यकर्ते शेखर सोनाळकर, वासंती दिघे व डॉ. संग्राम पाटील यांच्या हस्ते होईल. दरम्यान वर्धिष्णूमध्ये जळगाव महानगरपालिकेसोबत काम करणाऱ्या कचरा कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. अत्यंत कमी वेतनामध्ये काम करणाऱ्या या कामगारांचे आर्थिक पुनर्वसन व तरुण/बालकामगारांचे शैक्षणिक पुनर्वसन हे या उपक्रमाचे ध्येय असणार आहे. त्यांच्या वाटचालीसाठी वर्धिष्णूला शुभेच्छा !


स्त्रोत- अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com   

No comments:

Post a Comment