'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 1 August 2013

गृत्समद

‘नयी तालीम’ पद्धतीत एखादे काम करण्याला जेवढे करण्याला महत्त्व, तेवढेच आपल्या करण्याचा परिणाम तपासण्याला आणि तेवढेच ते काम अधिक चांगले कसे करता येईल याचा अभ्यास करून ते पुन्हा करण्याला. अशा प्रकारच्या कृतीशील संशोधनाचे एक प्राचीन भारतीय प्रतीक म्हणजे गृत्समद ऋषी ! आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे राहणाऱ्या गृत्समद ऋषींनी कापसाच्या लागवडीचा जगातला पहिला प्रयोग केला. गृत्समद ऋषींबद्दल आणि त्यांच्या प्रयोगांबद्दल हा विनोबांचा लेख !









तुम्हाला 'गृत्समद' हा लेख आवडला का?

No comments:

Post a Comment