'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 22 October 2013

दलितांच्या पैशांतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण ?

काही दिवसांपूर्वी एरंडोल नगरपालिकेतर्फे ‘स्मशानभूमी सुशोभीकरणा’साठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र माहितीच्या अधिकाराखाली या सुशोभीकरणासाठी ‘दलित वस्ती सुधार योजने’चा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संग्राम पाटील व डॉ. सचिन महाले (निर्माण ५) यांना मिळाली. यावर त्यांनी तात्काळ दलित, आदिवासी व भिल्ल वस्त्यांची मीटिंग घेऊन दुसऱ्याच दिवशी रास्ता रोको आंदोलन केले. ‘या वस्त्यांमध्ये रस्ते, पथदिवे, पाणी, सार्वजनिक शौचालये अशा मूलभूत सुविधा झाल्यानंतरच सुशोभीकरण करण्यात यावे’ अशी जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलनाबाबत बोलताना सचिन म्हणाला, “या आंदोलनासाठी तब्बल ७००-८०० भिल्ल व दलित बांधव रस्त्यावर होते. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की वृत्तपत्रांना नगरपालिकेकडून जाहिराती मिळत असल्याने त्यांनी एवढ्या मोठ्या आंदोलनाची दखलसुद्धा घेतली नाही.”
स्त्रोत : डॉ. सचिन महाले- dr.sachin.mahale@gmail.com

No comments:

Post a Comment